नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत सरकारचा अडथळा; निवडणूक आयोग न्यायालयात

नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत सरकारचा अडथळा; निवडणूक आयोग न्यायालयात

नागपूर : गावांच्या सीमांमध्ये सातत्याने बदल करून राज्य सरकार जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करीत आहे, असा थेट आरोप करणारी याचिका राज्य निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. 

या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या विरोधात याचिका केल्याने राज्य सरकारची इभ्रत गेल्याची टीका नागपूर जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केली.

नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित आहे. आरक्षणाच्या संदर्भातील आक्षेपांवरून निवडणुकीचे प्रकरण न्यायालयात गेले आणि यथास्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, यादरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे काम राज्य निवडणूक आयोग करीत होते. यादरम्यान राज्य सरकारने काही गावांना नगरपरिषद घोषित केल्याने मतदारसंघांच्या रचनेमध्ये बदल झाले. दोनवेळा सीमा बदलाच्या अडचणीचा सामना करावा लागला. राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे निवडणूक आयोगाने थेट सरकारच्याच विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

2017 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेची निवडणुक प्रलंबित होती. निवडणूक आयोगाने यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली. निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच राज्य सरकारने वानाडोंगरी नगरपरिषद स्थापन केली. त्यामुळे आयोगाची प्रक्रिया व्यर्थ ठरली. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये पुन्हा एकदा निवडणुक आयोगाने प्रक्रिया सुरू केल्यानंतर बुटीबोरी नगरपरिषद घोषित केली. दोनवेळा गावांच्या सीमा बदलल्यामुळे राज्य सरकार निवडणुक प्रक्रियेत बाधा निर्माण करीत आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. 
निवडणक आयोगाची प्रक्रिया सुरू झाल्यावर राज्य सरकारने सीमा बदलू नये, असे आदेश न्यायालयाने द्यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. राज्य सरकारला नोटीस बजावून उत्तर दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

राज्य सरकारची अब्रू गेली- राजेंद्र मुळक
राज्य सरकारच्या विरोधात राज्य निवडणूक आयोग उच्च न्यायालयात गेल्याने राज्य सरकारची इभ्रत गेल्याची टीका नागपूर जिल्हा कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केला. राज्य सरकार वारंवार काहीतरी कारणे देऊन नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक गेल्या दीड वर्षापासून टाळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूक टाळत आहे. भाजपला पराभवाची भीती असल्याने ही निवडणूक टाळत असल्याचा आरोप मुळक यांनी "सरकारनामा'शी बोलताना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com