चांदूररेल्वे (जि. अमरावती) ः महाराष्ट्रात सत्तेचा खेळ सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज टिंगल टवाळीचा विषय बनले असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
गेल्या एक महिन्यापासून राज्यात स्थापन होऊ शकले नाही. शिवसेनेने पुन्हा भाजपबरोबर जाण्यास नकार दिल्याने फडणवीस हे दुसऱ्यांचा लगेच मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. आता तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे ही भाजपला मिळाले आहेत. कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सत्तेचा पोरखेळ सुरू असल्याचे आंबेडकर यांना वाटते.
येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आज महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यावर मला कुठलीही टिप्पणी करायची नाही, परंतु मध्यावधी निवडणुका लागल्यास या सर्व संधीसाधू पक्षांच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडीच सक्षम पर्याय म्हणून समोर येईल. भाजपला बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी किती आमदार आजारी पडणार, किती गैरहजर राहणार, त्यावर सत्तेचा खेळ असून फडणवीस हे टिंगल टवाळीचा विषय बनले आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.