नाशिक : सरकार चालवतांना आम्ही कोणाला धमकावले? गुंडांनी कोणाला पकडून जबरदस्ती केली? असे एक तरी उदाहरण संजय राऊत यांनी सांगावे. मात्र, महायुतीत वाद निर्माण होईल अशी विधाने करु नयेत, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध गावांना भेटी देऊन पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा केली. या दरम्यान शिवसेनेकडून येणारी विधाने आणि विशेषतः खासदार संजय राऊत यांनी 'भाजप हा एखाद्या गुंडांच्या टोळीसारखा पक्ष चालवतो' या विधानावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ''गेली पाच वर्षे राज्यात भाजप- शिवसेना महायुतीचे राज्य होते. मात्र, आम्ही अतिशय चांगला कारभार केला. कोणाला गुंडाने धमकावले? एखाद्याला गुंडाने पकडून अमक्यालाच पाठींबा दे असे सांगितले, किंवा पोलिसांनी कोणाला पकडून वेगळे काही केले, असे कुठे घडले असेल तर त्याचे उदाहरण सांगावे. मात्र, विनाकारण शिवसेना- भाजप या दोन्ही पक्षांत मतभेद होतील, वाद वाढेल अशी विधाने करु नयेत,''
ते पुढे म्हणाले, ''शिवसेनेने संजय राऊत यांना बोलण्याचे अधिकार दिले आहेत. म्हणून ते बोलत आहेत. आमच्या पक्षाने आम्हाला यावर मत व्यक्त करु नये, अशी सुचना केली आहे. त्यामुळे आम्ही शांत आहोत. आम्ही त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मात्र येत्या काही दिवसांत राज्यातील सरकार स्थापनेबाबत योग्य तो निर्णय होईल. तोपर्यंत वादग्रस्त विधाने टाळावीत. दोन्ही पक्षांत मतबेध वाढतील असे बालु नये,'' असे मला वाटते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.