विरोधकांना वाटले मी संपलो, मात्र मी मंत्री झालो...छगन भुजबळ

गेली पाच वर्षे खूप खडतर होती. मात्र, त्याच बरोबर जनतेचा, समाजाचा पाठींबाही तेव्हढाच मिळाला. एखाद्या सिनेमासारखे हे सर्व माझ्या डोळ्यापुढे तरळत राहते. विशेषतः नाशिकला आल्यावर तर त्याची प्रकर्षाने जाणीव होते. कारण याच नाशिकमध्ये माझ्यासाठी दहा लाख लोकांनी मोर्चा काढला होता. अगदी एैंशी वर्षाची आजीही रस्त्यावर आली होती, असे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी येथे सांगितले
Opponents Felt I am Finished, But I became Minister again Say Chagan Bhujbal
Opponents Felt I am Finished, But I became Minister again Say Chagan Bhujbal

नाशिक : ''गेली पाच वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वाधीक खडतर होती. खूप संघर्ष करावा लागला. माझ्या विरोधकांना वाटले मी संपलो. आता पुन्हा येणार नाही. मात्र, जनतेचे प्रेम अन्‌ शरद पवारांमुळे मला नवजीवन मिळाले. मी मंत्री झालो. पुन्हा नव्या इनिंगसाठी उत्साहाने कामाला लागलो आहे,'' असे मंत्री छगन भुजबळ यांनी येथे सांगीतले.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महिन्याभराच्या खंडानंतर ते नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी 'भुजबळ फार्म' येथे कार्यकर्ते, नागरीकांनी शुभेच्छांसाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी ते म्हणाले, ''गेली पाच वर्षे खूप खडतर होती. मात्र, त्याच बरोबर जनतेचा, समाजाचा पाठींबाही तेव्हढाच मिळाला. एखाद्या सिनेमासारखे हे सर्व माझ्या डोळ्यापुढे तरळत राहते. विशेषतः नाशिकला आल्यावर तर त्याची प्रकर्षाने जाणीव होते. कारण याच नाशिकमध्ये माझ्यासाठी दहा लाख लोकांनी मोर्चा काढला होता. अगदी एैंशी वर्षाची आजीही रस्त्यावर आली होती.''

ते पुढे म्हणाले, "माझ्या विरोधकांना वाटत होते मी संपलो. पुन्हा येणार नाही. तेव्हा जनतेने, विशेषतः येवल्याच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले. संकटाच्या काळात अनेक बरोबर राहिले. त्यामुळे आणि शरद पवार यांच्यामुळे मी मंत्री झालो. राज्याचे, जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नव्या दमाने काम करतो आहे. येत्या एक दोन दिवसांत खातेवाटप होईल. त्यानंतर सरकारचे काम वेगाने पुढे जाईल."

मावळत्या सरकारने नाशिकसह अनेक ठिकाणी सुरु असलेली विकासकामे ठप्प करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ''नाशिकमध्ये अनेक प्रकल्प पालकमंत्री असताना मी सुरु केले होते. त्यात बोट क्‍लब एक होता. त्यासाठी अमेरिकेहून प्रदुषण विरहीत बोटी आल्या होत्या. हे काम ठप्प झाले. त्या बोटी कुठे गेल्या, कुणी नेल्या याचा पत्ता नाही. त्याच्या चौकशीच्या सुचना मी केल्या आहेत. विविध रस्ते, महामार्ग, विमानतळ, विमानसेवा आदी प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी होती. मात्र, ते सर्व मागे पडले. या सगळ्यांचा आढावा घेऊन माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com