जळगाव : राज्यात युतीला अनुकूल वातावरण आहे, जनतेत मतदानात मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. राज्यात पुन्हा युती सरकार आणावयाचे आहे. त्यामुळे राज्यात युतीला २१० ते २१५ जागा मिळतील असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. मतदानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जामनेर येथील न्यू इंग्लीश स्कूलच्या मतदान केंद्रावर गिरीश महाजन यांनी पत्नी नगराध्यक्ष साधना महाजन व कन्या प्रिया व श्रेया सोबत मतदान केले. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, ''पावसामुळे शेतकरी,शेतमजूर घरीच आहेत, त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का निश्चित वाढणार आहे. युतीच्या विजयाबाबत ते म्हणाले, कि राज्यात युतीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. जनतेत मोठ्या प्रमाणात उत्साह आहे.त्यांना पुन्हा राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावयाचे आहे. त्यामुळे युतील यावेळी स्पष्ट बहुमत मिळेल. उत्तर महाराष्ट्रात ४७ जागापैकी युतीला ३८ ते ४० जागा निश्चित मिळतील.विरोधकांना दहा ते बाराच्यावर जागा मिळणार नाहीत.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.