देवाने राज्य सरकारला सूडबुद्धी नव्हे: सदबुद्धी द्यावी

विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा तसेच भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांची सुरक्षा कमी करण्याची महाविकास आघाडी सरकारची कृती आकसापोटीची आहे
sar17.jpg
sar17.jpg

पुणे : विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा तसेच भारतीय जनता पार्टीच्या इतर नेत्यांची सुरक्षा कमी करण्याची महाविकास आघाडी सरकारची कृती आकसापोटीची आहे. देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य नेत्यांची सुरक्षा काढल्याचे दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा पुण्यातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली आमच्या नेत्यांची भक्कमपणे सुरक्षा करू, असा विश्‍वास भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर व्यक्त केला.


राज्य सरकारने नेत्यांची सुरक्षा कमी केली तरी त्यांच्या संरक्षणास आम्ही समर्थ आहोत. या सरकारने आता किमान माता-भगिणींची आणि मंदिरातील देवी-देवतांचे रक्षण करावे, सल्लावजा चिमटाही मानकर यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांना पुरविलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत, फडणवीस, पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार नारायण राणे यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने शनिवारी घेतला अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करीत, केवळ राजकीय सुडातून विरोधकांच्या सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचा मानकर यांनी निषेध केला.

मानकर म्हणाले, "लोकांच्या रोजच्या जगण्यातील प्रश्न गंभीर झाले असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सध्या राजकारण करीत आहे. सर्वच पातळ्यांवर विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ज्यांना जनाधार आहे, ते सरकारच्या डावपेचनी संपणार नाहीत, हे सत्ताधाऱ्यांना कळायला हवे. नेमके तेच करत नसल्याने या पुढच्या काळात पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रालील भाजप नेत्यांच्या सुरक्षेसाठी युवा मार्चाया प्रत्येक कार्यकर्ता काम करेल हेच कार्यकर्ते लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर असतील, परंतु लोकाच्या सुरक्षेत कपात करणाऱ्यांनी आमच्या माता-भगिणींच्या सरक्षणासाठी झटाये ज्यामुळे प्रत्येक कुटुंबातील महिला सुरक्षित राहतील. मंदिरातही चोरटे घुसत असल्याने देवतांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत, महिलांसह मंदिराच्या सुरक्षिततेला सरकारचे प्राधान्य असेल, त्यासाठी देव त्यांना सूडबुद्धी नव्हे सदबुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो, असे मानकर यांनी म्हटले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com