Shirur Lok Sabha: "जनतेचं भलं बघायचं, स्वत:च्या..."; आढळराव-पाटील अन् कोल्हेंमध्ये 'नागरिकशास्त्रा'वरून जुंपली

Shirur Lok Sabha Election 2024: नागरिकशास्त्रात खासदारांनी जनतेची कामंच करायची नसतात, फक्त भाषणं करायची हे चालणार नाही; असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhesarkarnama

Shirur Lok Sabha Election 2024: शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गट अशी लढत होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याबद्दलची उत्सुकता आहे. शिवाय दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. (Shirur Lok Sabha Constituency)

इथे अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) रिंगणात आहेत, तर शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

अशातच आता या दोन्ही उमेदवारांमध्ये नागरिकशास्त्र विषयावरून जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकशास्त्रात खासदारांनी जनतेची कामंच करायची नसतात, फक्त भाषणं करायची हे चालणार नाही, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) टीका केली आहे. आढळराव पाटलांच्या या टीकेला कोल्हेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'जनतेचं भलं बघायचं स्वत:च्या कंपन्यांचे नाही हेच नागरिकशास्त्र महत्त्वाचे असतं,' असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांवर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार निवडून गेल्यावर लोकांमध्ये यायचंच नसतं, त्यानं दिल्लीतच (Delhi) थांबायचं. लोकांच्या अडीअडचणीला जायचं नाही हे कोल्हेंचं म्हणणं पटतं का? असा प्रश्न उपस्थित करत आढळरावांनी नागरिकशास्त्राचा धडा दिला होता. ते म्हणाले, "नागरिकशास्त्रात खासदारांनी कामंच करायची नसतात, फक्त भाषणं करायची, असं करून चालणार नाही."

Shivajirao Adhalrao Patil, Dr. Amol Kolhe
Ajit Pawar News: EVMचे बटन दाबताना हात आखडता घेऊ नका; अन्यथा निधी देताना आम्हालाही...

आढळरावांच्या याच वक्तव्यावर कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोल्हे म्हणाले, 2013 ला कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा निर्यातबंदी करावी, यासाठी आढळराव पाटलांनी संसदेत आवाज उठवला. पण शेतकऱ्याचा मुलगा म्हणून संसदेत निलंबन झालं तरी कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका मी मांडत राहिलो. दोघांमध्ये हाच फरक असल्याचे म्हणत नेमकं कुठलं नागरिकशास्त्र पाहायचं? नागरिकशास्त्रात जनतेचं भलं बघायचं असतं, स्वत:च्या कंपन्यांचे नाही, हेच नागरिकशास्त्र महत्त्वाचे असते, असं म्हणत कोल्हेंनी आढळराव पाटलांवर निशाणा साधला आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com