नोटबंदीनंतर नक्षलवाद वाढताना दिसतोय :  पृथ्वीराज चव्हाण 

 नोटबंदीनंतर नक्षलवाद वाढताना दिसतोय :  पृथ्वीराज चव्हाण 

मुंबई : " नक्षली हल्ला दुर्दैवी आहे .  नोटबंदीमुळे  दहशतवाद - नक्षलवाद  संपेल अस म्हणत होते, वास्तविक तो वाढताना दिसतो. राष्ट्रीय सुरक्षा, नक्षलवाद   यात राजकारण नको, पण भाजप निवडणूक जिंकायची याच हेतूने सैनिकांच्या  नावाने मते मागत आहे," अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली . 

ते पुढे म्हणाले, "नक्षली हल्ला असो पुलवामा हल्ला इंटेलिजिन्स फेल्युलर दिसून येते. आमची मागणी सरकारने चौकशी नेमली पाहिजे.  मुख्यमंत्र्यांवर या घटनेची नैतिक  जबाबदारी येते . गडचिरोली हल्ल्यात कोणाकडून कर्तव्य बजावण्यात  कसूर झाली  याची जबाबदारी निश्चित  केली पाहिजे. आणि दोषींवर  कारवाई केली पाहिजे. "

 श्री. चव्हाण म्हणाले, " इलेक्शन सुरू असतानाही  सरकारने  दुष्काळा बाबतची  आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे होते  . आचारसंहिता  दुष्काळ निवारणासाठी  निर्णय घेताना  अडचणीची  नाही, सीएम असे सांगतात ते योग्य नाही.  आम्ही सर्व विरोधक दुष्काळ बाबत एकत्रित आहोत पण  सीएम टाळाटाळ करत आहेत अस वाटते . फडवणीस सरकारचे  जनावरांच्या  छावण्यांकडे लक्ष नाही . " 

ईव्हीएम बाबत शंका कायमची दूर केली पाहिजे. पवार काय बोलले यावर मला बोलणे योग्य वाटत नाही. पारदर्शकता अधिक होणे गरजेचे आहे ,  असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com