शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, असे तुळजाभवानीमातेला साकडे घातले: उदयनराजे भोसले 

निवडून आलेले आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य योग्य पद्धतीने काम करीत नसतील, तर त्यांना परत बोलविले पाहिजे. - उदयनराजे भोसले
UdayanRaje-@-Tulja-Bhavani-
UdayanRaje-@-Tulja-Bhavani-

तुळजापूर:   " शेतीला उद्योग-धंद्यांचा दर्जा प्राप्त होऊन शेतकऱ्यांचे सारे प्रश्न मिटले पाहिजेत. राज्यासह देशातील शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, असे तुळजाभवानीमातेला साकडे घातले आहे," असे खासदार उदयनराजे भोसले तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले . 

तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यावर पत्रकारांशी बोलताना ते पुढे  म्हणाले, " शासनाने शेतकऱ्यांसाठी चांगली पीकविमा योजना लागू करावी. भारत कृषिप्रधान देश असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहेत. शेतकरी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर अनेक घटक अवलंबून आहेत, त्यामुळेच शेतकरी पोशिंदा मानला जातो. सरकार कोणतेही असो, सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी चांगल्या योजना लागू झाल्या पाहिजेत."

"सध्या पीकविम्यापोटी मिळणारी भरपाई तुटपुंजी आहे. वेगवेगळ्या योजनांद्वारे सरकारकडे अडीच ते तीन लाख कोटी रुपये येतात. ही आकडेवारी कमी-जास्त प्रमाणात असेल; तथापि त्या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांसाठी झाला पाहिजे. सध्या दुर्दैवाने सद्यःस्थिती तशी नाही. शेतीला उद्योग-धंद्यांचा दर्जा प्राप्त होऊन शेतकऱ्यांचे सारे प्रश्न मिटले पाहिजेत. राज्यासह देशातील शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, असे तुळजाभवानीमातेला साकडे घातले आहे,''असेही उदयनराजे यांनी सांगितले . 

" इलेक्‍ट्रॉनिक्‍स मतदान यंत्रे, संगणक या बाबी आपण अत्याधुनिक, सुधारित म्हणून स्वीकारल्या आहेत. तथापि, आईतखाऊपणा नको आहे. मतदानप्रक्रियेत मतपत्रिकेवर शिक्का मारण्याची पूर्वीचीच पद्धत आवश्‍यक आहे. रोबो आणून घास चावायला लावायचा का? " असा प्रश्‍न खासदार उदयनराजे यांनी  केला . 

" येत्या 17 जूनपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत असून त्यात खासदार काय करतात, हेही महत्त्वाचे आहे, असे उदयनराजे म्हणाले. निवडून आलेले आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य योग्य पद्धतीने काम करीत नसतील, तर त्यांना परत बोलविले पाहिजे," असे मतही त्यांनी मांडले.  

खासदार उदयनराजे दर्शनासाठी पहाटे पावणेसहाच्या सुमारास तुळजाभवानी  मंदिरात आले. दर्शनानंतर त्यांनी अनेकांशी संवाद साधला. मंदिर समितीतर्फे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले यांनी त्यांचा सत्कार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गोकूळ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. दिग्विजय पाटील, अतुल मलबा आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com