'आता माघार नाही' शिष्टमंडळ मुंबईत, Manoj Jarange सरकारवर संतापले । Jalna News

मनोज जरांगे म्हणतात, मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही; आझाद मैदानावर आंदोलनाचा गुलाल उधळणारच!

मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहे. या आंदोलनाच्या पूर्व तयारीसाठी उद्या हे शिष्टमंडळ आझाद मैदानासह इतर मैदानाची पाहणी करणार आहे. दरम्यान मुंबईकडे शिष्ट मंडळ रवाना होण्याआधी जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत भूतो न भविष्यती असं आंदोलन होणार असून आमच्या मागण्या पूर्ण करा जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही असा ईशाइशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. मराठ्यांचा वाटेला जाऊ नका,आता अभ्यास ,गिभ्यास नाही, थेट आमच्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.मराठ्यांच्या डोक्यावर आंदोलनाचा गुलाल टाकणार म्हणजे टाकणार असा दावाही जरांगे यांनी केलाय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com