औरंगाबादचा पालकमंत्री मराठवाड्याचाच हवा : अतुल सावे

 औरंगाबादचा पालकमंत्री मराठवाड्याचाच हवा : अतुल सावे


औरंगाबाद : मुंबईतील व्यक्तीलाच आत्तापर्यंत मित्रपक्ष शिवसेनेने औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री केले. मात्र त्यांना आपले व्याप असतात, मर्यादा आहेत. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा असल्यास येथील पालकमंत्रीपद हे मराठवाड्यातील एखाद्या मंत्र्याकडे सोपवण्यात यावे, ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. आपल्याला त्या पदाची जबाबदारी सोपवली तर आनंदाने काम करु असे वाक्‍यही त्यांनी पुढे जोडले. 

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आत्तापर्यंत पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत आणि आता सार्वजनिक बांधाकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काम पाहिले आहे हे नेते मुंबईचे असून त्यांच्या मागे त्यांचे व्याप असतात. मुंबईतून येऊन औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार पाहणे अवघड काम आहे. त्यामुळे येथील पालकमंत्री पद हे मराठवाड्यातीलच नेत्याकडे सोपवण्यात यावे. ते मलाच द्या असे आपले म्हणणे नाही, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, संभाजीराव निलंगेकर किंवा पंकजा मुंडे यांच्यापैकी कोणालाही ही जबाबदारी द्यावी अशी आपली भावना असल्याचे सावे यांनी सांगितले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या उपस्थित आयोजित सत्कार सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com