मुख्यमंत्र्यांच्या दरबारी उद्धव ठाकरे बेदखल ? 

मुख्यमंत्र्यांच्या दरबारी उद्धव ठाकरे बेदखल ? 

मुंबई ः येणारे वर्ष हे निवडणूकीचे वर्ष आहे. हे लक्षात घेऊन आपण शिवसेनेच्या सर्व आमदारांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील विकास कामांकरिता प्रत्येकी 10 कोटी रूपयांच्या विशेष निधीची ठोक तरतूद करून द्यावी. अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र इतर रूटीन पत्रांप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाने हे पत्र अर्थमंत्र्यांच्या कार्यालयात पाठविण्याचे सोपस्कार पार पाडलेत. त्यामुळे मख्यमंत्र्याच्या दरबारी उध्दव ठाकरे बेदखल झाल्याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे. 

एखादा आमदार जरी मुख्यमंत्र्यांकडे पत्र घेऊन आला तरी त्यावर मुख्यमंत्री स्वतः शेरा मारून खाली कार्यवाहीसाठी पाठवित असतात. मात्र शिवसेना विधानमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवर शिवसेना मंत्री आणि गटनते आणि प्रतोद यांच्या सहीच्या पत्राची मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हवी तेवढ्या प्रमाणात दखल घेतली गेली नसल्याची चर्चा मंत्रालयात आहे. 

एवढेच काय तर मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांनी अर्थमंत्र्यांच्या खासगी सचिवाला पत्र लिहून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पाठवित आहोत मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून द्यावी एवढाच मजकूर त्या पत्रात लिहला आहे. त्यामुळे एककीडे निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सेनेने निधीची मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने या मागणीला सरकारी खाका दाखवित फायलीतच जमा केल्याचे सध्या तरी चित्र आहे. मात्र आमचा मुख्यमंत्र्यावर विश्‍वास आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या या निधीमुळे महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागणार असून लोकहिताची कामे मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com