500 'वीरशैव-हिंदू' लिंगायत मठांनी बदलला कर्नाटकचा निकाल! 

कर्नाटकात 18 टक्‍के लिंगायत समाजाचा सर्वाधिक प्रभाव आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (बीजेपी) व येडीयुराप्पांचा पक्ष (केजेपी) स्वतंत्रपणे लढल्याने भाजपबरोबरच लिंगायत प्रभावाची सत्ता गेली. मुस्लीम, दलित आणि कुरबा (धनगर) हे घटक मोठ्या प्रमाणात कॉंग्रेसबरोबर राहिल्याने त्यांची सत्ता आली. वोक्‍कालिंग हे नेहमीप्रमाणे देवेगौडांच्या (जेडीएस) पक्षाबरोबर राहिले. आता 2018 ला येडीयुराप्पांच्या माध्यमातून लिंगायत समाजाला सत्ताधारी बनण्याची संधी होती, ती कोणत्याही प्रकारे चुकू नये, याची काळजी लिंगायतांनी घेतलेली दिसते.
500 'वीरशैव-हिंदू' लिंगायत मठांनी बदलला कर्नाटकचा निकाल! 

पुणे: कर्नाटक विधानसभेची निवडणूक घोषित होण्यापुर्वी सहा महिने अगोदर कॉंग्रेसचे वातावरण होते. त्यानंतर लिंगायताचा मुद्दा आला आणि त्याभोवतीच राजकारण फिरत राहिले. मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्ममान्यता आणि अल्पसंख्याक दर्जासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली. सिद्धारमय्या आणि कॉंग्रेस बळकट होत असल्याचे दिसत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मैदानात उतरले. त्यानंतर लिंगायत स्वतंत्र धर्माच्याविरुद्ध वीरशैव- हिंदू अस्मिता पुढे आणण्यात आल्या. त्याबरोबरच 500 संस्थानिक मठ भाजपकडे वळविण्यात आले. त्याचे परिणाम कर्नाटकच्या निकालांत दिसत आहेत. 

कॉंग्रेसकडे विकासाच्या मुद्यावर बरेच काही सांगण्यासारखे होते, त्याशिवाय मुस्लीम, दलित, कुरबा ही हक्‍काची मतपेढी होती. त्यातच लिंगायतांच्या मागण्यांचे मोर्चे सुरु झाले. बिदरमधून सुरु झालेल्या मोर्चांनी स्वतंत्र धर्ममान्यता व अल्पसंख्याक दर्जाची मागणी केली. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी काही मठही पुढे आले होते. कर्नाटकातील आठ दहा जिल्ह्यात हजारोंचे लिंगायत मोर्चे निघाले. या मागण्यांची पुर्तता करण्याच्या निमित्ताने लिंगायत समाज मोठ्या संख्येने जोडून घेण्याची संधी होती. ती सिद्धारमय्यांनी साधली. त्यादृष्टीने सिद्धारामय्या सकारात्मक पावले टाकत असताना भाजपने प्रतिडाव टाकले. लिंगायत स्वतंत्र धर्म नाहीच, हे तर हिंदूंना कमजोर करण्याचे कॉंग्रेसचे कारस्थान असल्याची टीका करण्यात आली. 

निवडणुका जाहीर होण्यापुर्वी काही दिवस सिद्धारमय्या यांनी लिंगायतांच्या मागण्यांची शिफारस केंद्राकडे केली. त्यामुळे लिंगायत मतपेढी आपल्याबरोबर कायम राहावी, यासाठी भाजपने ताकद लावली. मुख्यत: अमित शाह यांनी या व्होटबॅंकेचे बारकाईने नियोजन केले. कर्नाटकात लिंगायतांचे 800 च्यावर मठ आहेत. संस्थानिक मठांच्या अंतर्गत हजारो छोटे मठ येतात. भाजपने हे मठाधीश मोठया संख्येने आपल्याकडे वळवून घेतले. "लिंगायत हा स्वतंत्र धर्म नाही, तो हिंदू धर्माचा भाग आहे, वीरशैव हा पंथ आहे', अशी मांडणी करत भाजपने धर्मगुरुंना आपल्या बाजूने उतरले. 500 हून अधिक मठ भाजपच्या बाजूला होते. त्यातील बहुतेक मठांना अमित शाहंनी भेटी दिल्या. त्याचा परिणाम भाजपचे 47 लिंगायतबहुल मतदारसंघातील उमेदवार निवडूण आले आहेत. कॉंग्रेसच्या लिंगायतबहुल मतदारसंघातील आमदारांची संख्या 25 च्या जवळ आहे. लिंगायतांनी हिंदू अस्मितेच्या बाजूने मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट होते आहे. 

लिंगायतांनी समाजाचे नेतृत्व म्हणून येडीयुराप्पा यांना पाठिंबा दिल्याचे निकालात स्पष्टपणे दिसत आहे. 2013 च्या निवडणुकीत लिंगायत प्राबल्य कमी झाले होते, ते या निवडणुकीत पुन्हा मिळविण्याची संधी लिंगायतांसमोर होती. लिंगायत येडीयुराप्पांकडे मुख्यमंत्रीपदाची सुत्रे येणार म्हणून समाजाच्या कल भाजपच्या दिशेने गेला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com