भाजपची अरेरावी जास्तच वाढली आहे : संदीप देशपांडे 

 भाजपची अरेरावी जास्तच वाढली आहे : संदीप देशपांडे 

मुंबई : आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करताना सरकारने विचार करावा. कारवाई करायची असेल तर अनधिकृत फेरीवाल्यांवर करा, मनसे कार्यकर्त्यांवर नको. भाजप सरकारची अरेरावी जास्तच वाढली आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 'सरकारनामा' शी बोलताना केला.

मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधवला तहसिलदाराने एक कोटीचा जामीनदार आणा तरच जामीन मिळेल अशी नोटीस पाठविल्यावर देशपांडे यांनी थेट भाजपवरच आरोप केला. 

या सगळ्या प्रकाराविरोधात मनसे न्यायालयात जाईन. तशी आम्ही तयारी सुद्धा केली आहे. मनसेवर भाजप दबाव टाकत असून हे आम्ही कदापि सहन करणार नाही, असेही देशपांडे म्हणाले. हे आंदोलन चिरडण्यासाठी एक कोटीचा जामीन मागितल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. 

21 ऑक्‍टोबरला मनसेने ठाणे येथे अनेक फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोड व नासधूस केली होती. त्यावेळी अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करत तहसीलदारांकडून नोटीसही बजावण्यात आली होती. तसेच ठाण्यातील इतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना 25 लाख व 50 लाख रुपयांच्या नोटीसा बजावली आहे. आता या सगळ्या विरोधात मनसे न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com