Navjot Singh Sidhu
Navjot Singh Sidhu 
देश

आरोपी पोलिसांसमोर हजर अन् काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी संपवलं उपोषण

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला सहा दिवस उलटूनही केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला अटक झालेली नाही. यामुळे पंजाब काँग्रेसचे (Punjab Congress) प्रदेशाध्य नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी या घटनेतील मृताच्या घरी उपोषण सुरू केले होते. अखेर आशिष हा पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर सिद्धूंनी उपोषण मागे घेतली.

लखीमपूर खीरीतील घटनेत पत्रकार रमण कश्यप यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी सिद्धू यांनी कालपासून उपोषण सुरू केले होते. आशिष मिश्रा याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. कायदा आणि न्याय यापेक्षा कुणीही मोठे नाही परंतु, उत्तर प्रदेशातील भाजप सरकार आरोपी मंत्रिपुत्रावर कारवाई करताना दिसत नाही. सत्तेतील लोक आणि गरिबांसाठी उत्तर प्रदेशात वेगवेगळा कायदा आहे, अशी टीका सिद्धू यांनी केली होती.

आशिष मिश्रा हा आज चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झाला. यानंतर सिद्धूंनी उपोषण मागे घेतले. या प्रकरणी सिद्धू यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता आहे. शेतकरी मागील वर्षभरापासून आंदोलन करीत असले तरी त्यांना न्याय मिळालेला नाही. मी आणि शेतकऱ्यांचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. आमचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास कायम राखण्यासाठी एखाद्या नेत्याचा बळी आवश्यक आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने गदारोळ सुरू आहे. आशिष याला काल समन्स बजावूनही आज तो पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. यामुळे तो नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मंत्री अजय मिश्रा यांनी खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, माझ्या मुलाला चौकशीसाठी बोलावले होते परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव आज तो जाऊ शकला नाही. आता तो उद्या चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होईल. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा मुलगा निष्पाप आहे.

लखीमपूर खीरीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आशिष हा चौकशीसाठी हजर झाला. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याने पोलिसांनी त्याला मागील दाराने आतमध्ये घेतले. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आशिष यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. काल हेच उपेंद्र अगरवाल तीन तास आशिष हा चौकशीसाठी येईल या आशेवर वाट पाहत कार्यालयात बसले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT