Rahul Gandhi Sarkarnama
देश

Assembly Elections Results: विचारांचा लढा चालूच राहील; काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया...

Anand Surwase

Delhi News: लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या देशातील चार प्रमुख राज्यांच्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीमध्ये मध्य प्रदेशमध्ये सत्ता राखण्यात आणि राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसकडून सत्ता खेचून घेत पुनरागमन करण्यात भाजपला यश आले आहे.

छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता राखण्यात काँग्रेस अपयशी ठरले आहे, तर तेलंगणामध्ये बहुमताने विजयी होत काँग्रेसने केसीआर यांच्या बीआरएसला (BRS) जोरदार धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना विचारांचा लढा चालूच राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा भाजपकडून दारुण पराभव झाला आहे. यावर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट करत मध्य प्रदेश, छत्तीसगड और राजस्थान येथील जनादेशाचा आम्ही विनम्रपणे स्वीकार करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यापुढेदेखील विचारांची लढाई सुरूच राहणार असल्याचेही राहुल यांनी या वेळी स्पष्ट केले.

राजस्थानात काँग्रेसला (Congress) आपली सत्ता गमावावी लागली आहे. भाजपने राजस्थानात जोरदार मुसंडी मारली आहे. 199 जागांपैकी भाजपने 115, तर काँग्रेसला 70 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसने आपली सत्ता गमावली असल्यामुळे त्यांना आता विरोधात बसावे लागणार आहे. भाजप (BJP) आता 113 जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसला 72 जागांवर समाधान मानावे लागले.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT