Mallikarjun Kharge  Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge Press Conference : 24 तासांत खासदारकी काढली; आता परत किती वेळात करणार?; मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात जल्लोष करण्यात येत असून 'लोकशाही आणि संविधानाचा विजय झालाय...सत्यमेव जयते...', अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. आता राहुल गांधींना खासदारकी बहाल करण्यासाठी किती वेळ लागतो, हे आम्ही पाहत असल्याचे म्हणत मोदी सरकारला सवाल केला.

"आज आनंदाचा दिवस असून लोकशाही आणि संविधानाचा विजय झाला. फक्त राहुल गांधींचा हा विजय नसून पूर्ण देशाचा आहे. त्यामुळे आम्हीच नाही तर देशातील सगळे लोक खुश आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. संविधान जिवंत आहे, न्याय मिळू शकतो, याचे हे उदाहरण असून याचा देशाला फायदा होईल", असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

"आमची ही लढाई आम्ही अशीच सुरू ठेवणार असून लोकांना जागृत करण्यासाठी राहुल गांधी कन्याकुमारीपासून ते कश्मीर पर्यंत चालले. सर्वसामान्य लोकांना भेटले, बोलले त्यांचे आशीर्वाद मिळाले. राहुल गांधींना 24 तासात डिसमिस करण्यात आले. आता संसद काही किलोमीटर अंतरावर असून आज रात्रीच किंवा आताच राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा देतात का, किती वेळ लागेल त्यासाठी हे ही आम्ही बघत आहोत", असे म्हणत खर्गेंनी आपला रोष व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांना पुन्हा खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी त्यांना खासदारकी कधी बहाल करण्यात येते, त्यासाठी किती वेळ लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT