Narendra Modi| Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांना तुरूंगात संपविण्याचा कट; मोदी सरकारवर कुणी केला गंभीर आरोप?

Akshay Sabale

Political News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरूंगातच संपविण्याचा कट रचला जात आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे ( आप ) खासदार संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे.

केजरीवाल हे त्यांची प्रकृती खराब राहावी म्हणून जाणूनबुजून तुरूंगात जेवत नाहीत, असा दावा दिल्लीचे राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केली होता. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांच्या आरोपांकडे पाहिले जाते.

"भाजपचे (Bjp) नेते केजरीवाल यांच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्यांच्या हत्येचा कट रचला जात आहे," असा आरोप सिंह यांनी केला आहे.

सिंह म्हणाले, "याआधी केजरीवाल (Arvind Kejriwal) हे त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढावे म्हणून अधिक मिठाई खात असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होत. तर, आता अगदी त्या उलट केजरीवाल हे जेवत नसल्याचा दावा भाजपचे नेते करत आहेत."

"स्वत:च्या जिवाला धोका उत्पन्न होईल, असे कृत्य कोणी करेल का? केजरीवाल हे 21 मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत. या कालावधीत त्यांचे वजन आठ किलोने कमी झाले आहे. गंभीर आजारामुळे केजरीवाल यांचे वजन कमी झाले असावे, अशी शंका त्यांच्या आरोग्यविषयक अहवालात व्यक्त करण्यात आली होती. दिल्लीचे नायाब राज्यपाल ज्या पद्धतीची विधान करत आहेत ते पाहता केजरीवाल यांच्या जिवाला धोका असल्याचीच पुष्टी होते," असं सिंह यांनी म्हटलं.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना 'पीएमएलए' कायद्यानुसार ईडीनं अटक केलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. परंतु, सध्या केजरीवाल 'सीबीआय'च्या कोठडीत आहेत. त्यामुळे जामीन मिळाला, तरी केजरीवाल बाहेर येऊ शकणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT