BJP Wins Delhi Election Sarkarnama
देश

Delhi Election Results 2025 : 'या' 5 कारणांमुळे दिल्लीत कमळ फुललं! 'झाडू'ची जादू फेल अन् काँग्रेसचा सुपडासाफ

Delhi Assembly Election Analysis : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपला 44 जागा तर आम आदमी पक्षाला 24 जागा मिळाल्या आहेत. मात्र, काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

Jagdish Patil

Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपला (BJP) 44 जागा तर आम आदमी पक्षाला 24 जागा मिळाल्या आहेत. मात्र, काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

आम आदमी पक्ष (AAP) आणि भारतीय जनता पक्षाची आकडेवारी पाहता दिल्लीत आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण दिल्लीत बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता असून भाजपकडे सध्या 44 जागा आहेत. त्यामुळे आता तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपची सत्ता दिल्लीत येणार आहे.

देशात सत्ता असतानाही देशाची राजधानी आपल्या ताब्यात नाही याची सल भाजपच्या मनात होती. यासाठी यंदाची निवडणूक काहीही करून जिंकायची यासाठी भाजपचे मोठी फिल्डिंग लावली होती. हीच भाजपची रणनीती आता यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या या निकालानंतर दिल्लीत भाजपचा (BJP) विजय आणि आपचा पराभव कशामुळे झाला याबाबतची काही कारणे जाणून घेऊया.

स्वतंत्र लढत

आपच्या पराभवाचं सर्वात महत्वाचं आणि प्रमुख कारण म्हणजे काँग्रेससोबत (Congress) युती न करणं हे असल्याचं बोललं जात आहे. तसंच एमआयएम आणि काँग्रेसमुळे मतांचं विभाजन झाल्यामुळे मुस्लिम बहुल भागात देखील भाजपचा विजय सोपा झाला.

भ्रष्टाचाराचे आरोप

दुसरं कारण म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचार हा एक कळीचा मुद्दा ठरला. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये तुरुंगाची हवा खावी लागली. त्यामुळे कुठेतरी पक्षाच्या प्रतीमेला धक्का पोहोचला. ज्याचे पडसाद निकालात दिसून आले.

विकासकामांचा अभाव

तर आपची सत्ता असतानाही मागील काळात दिल्लीतील पायाभूत सुविधांवर म्हणावी अशी कामे झाली नाहीत. याचा त्रास दिल्लीकरांना सहन करावा लागला. दिल्लीत सत्ता असताना आपचे नेते केवळ केंद्र सरकारवर टीका करत राहिले, त्यामुळे सत्ता असूनही कामे न झाल्याने दिल्लीकरांनी वेगळा विचार केल्याचं सांगितलं जात आहे.

शीशमहल

आणखी एक महत्वाचा मुद्दा गाजला तो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा. भाजपने शीशमहलचा मुद्दा उपस्थित करत आपने दिल्लीकरांचा पैसा वाया घालवल्याचा मुद्दा लावून धरला.

मोफत सुविधा

आपण केलेली कामे न सांगता निवडणूक प्रचारादरम्यान केजरीवालांनी केवळ मोफत वस्तू देण्याच्या घोषणांचा धडाका लावला होता. त्यामध्ये पुजाऱ्यांना पगार असो वा महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा. यामुळे आधीच विकासकामांपासून वंचित असलेल्या दिल्लीकरांनी आपला डावलल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT