SC Hearing On Maharashtra Poltical Crisis
SC Hearing On Maharashtra Poltical Crisis  Sarkarnama
देश

Supreme Court : न्यायालयाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया , सत्याचा विजय झाला..; आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं..

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court Final Decision on Shivsena Case : सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आपला निर्णय दिला आहे. या निर्णयामध्ये कोर्टाने प्रतोद निवड आणि राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) राजीनाम्यामुळे आपण स्थिती पूर्ववत आणू शकत नाही असं म्हणत शिंदे सरकार (Shinde Government) वाचलं असल्याचा निर्णय दिला आहे.(Eknath Shinde on Supreme Court Final Decision on Shivsena Case)

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "लोकशाहीत अपेक्षित असलेला हा निकाल आहे, सत्येचा विजय झाला,"

"लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. देशात संविधान आहे, फायदा, नियम आहे, त्याबाहेर कुणालाही जाता येत नाही, कायदेशीर बाबीची पुर्तता करुनच आम्ही सरकार स्थापन केले आहे. बेकायदेशी सरकार, घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांनाच न्यायालयानं कालबाह्य केले, त्यांना न्यायालयानं चपराक दिली आहे. अपात्रेचा अधिकार अध्यक्षांना असतो, असा आम्ही दावा केला होता, तोच निर्णय न्यायालयानं घेतला आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.

" ठाकरे सरकार अल्पमतात आले, हे राज्यापालांसह सगळ्यानेच माहित होते, त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याखेरीज कुठलाच पर्याय नव्हता," असे शिंदे म्हणाले. "आम्ही जनमताचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा आम्ही आदर केला आहे," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हे सत्तासंघर्षाच्या प्रकरणातील टर्निंग पॉईंट ठरला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही कायदेशीररित्या चूक ठरली असेल पण या गद्दारांकडून अविश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणं मला तेव्हाही मान्य नव्हतं आजही मान्य नसेल असे म्हटलं आहे. जर सध्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

नैतिकता कुणी जपली..

ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, " नैतिकता कुणी जपली, हे मला सांगण्याची गरज नाही, धनुष्यबाण वाचविण्याचे काम आम्ही केले आहे, तुम्ही धनुष्यबाण गहाण ठेवला होता. हे सरकार कायदेशीर असल्याचे न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे," "उद्धव ठाकरेंनी लाजेपोटी राजीनामा दिला," असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फिरलं, असे फडणवीस म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT