Rahul Gandhi Visits Wayanad  Sarkarnama
देश

Rahul Gandhi Visits Wayanad : राहुल गांधींना वायनाडचे आदिवासी म्हणाले, "परत याल तर पंतप्रधान बनूनच या"

सरकारनामा ब्यूरो

Thiruvananthapuram : संसदेचे सदस्यत्व बहाल झाल्यानंतर कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul gandhi)यांनी त्यांचा लोकसभा मतदार संघ असलेल्या वायनाडला भेट दिली. आदिवासी समाजाची भेट घेतली. "तुम्ही परत याल तर पंतप्रधान म्हणून या ठिकाणी परत या," अशा शुभेच्छा आदिवासी समाजाने त्यांना दिल्या.

राहुल गांधी यांनी उटीजवळील मुथुनडू गावात टोडा आदिवासी समुदायाची भेट घेतली. तोडा आदिवासी समुदायाच्या सदस्यांसह पारंपारिक नृत्यात ते सहभागी झाले. राहुल गांधी यांनी येथील मंदिराला भेट देऊन तेथील पारंपारिक पद्धत जाणून घेतली. लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वायनाड दौरा आहे.

शनिवारी वायनाडमध्ये एका जाहीर सभेलाही त्यांनी संबोधित केले. केरळ काँग्रेसचे कार्याध्यक्ष व्ही.टी. सिद्दीकी यांनी त्यांचे स्वागत केले.

मणिपूरमध्ये कुणाचे घर जाळले गेले, कुणाच्या बहिणीवर बलात्कार झाला, तर कुणाचा भाऊ आणि आई-वडील मारले गेले. जणू काही मणिपूरभर कोणीतरी रॉकेल टाकून पेटवून दिले आहे. मी काही दिवसापूर्वी मणिपूरला गेलो होतो. मी 19 वर्षांपासून राजकारणात आहे आणि मी मणिपूरमध्ये जे अनुभवले तसे मी कधीही अनुभवले नसल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.

राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत केसी वेणुगोपाल यांनी ट्विट केले आहे. "वायनाडच्या लोकांना आनंद आहे की, लोकशाहीचा विजय झाला आणि राहुल गांधी यांचा आवाज पुन्हा संसदेत आला. राहुल गांधी हे केवळ त्यांचे खासदार नसून कुटुंबातील सदस्यासारखे आहेत,"

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT