PM Narendra Modi  Sarkarnama
देश

PM Narendra Modi In Loksabha : पहिल्या दीड तासांच्या भाषणात मोदी मणिपूरवर काहीच न बोलल्याने विरोधकांचा सभात्याग

सरकारनामा ब्यूरो

Delhi News: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेवरील भाषणात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत सरकारची बाजू मांडत विरोधकांना सुनावले. तर पहिल्या दीड तासांच्या भाषणात मोदींनी मणिपूर हिंसाचाराच्या घटनांबद्दल एक शब्दही न काढल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

मोदींनी अविश्वास प्रस्तावावर बोलताना जवळपास दोन तास भाषण केले. या अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मोदींनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस इतके वर्ष सत्तेत होते, मात्र, तरीही काँग्रेस अनुभवशुन्य असून देशात काँग्रेसने गरीबी वाढवली. काँग्रेसच्या काळात देश कंगाल झाला. काँग्रेसकडे नीती, नियत, दूरदृष्टी नाही, असा हल्लाबोल करत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला.

मोदींचे भाषण सुरू असतानाच विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर मोदींनी मणिपूरवर बोलत मणिपूरमध्ये शांतीचा सुर्य उगवत असून केंद्र सरकार मणिपूरच्या जनतेबरोबर आहे. मणिपूर पुन्हा विकासाच्या मार्गावर चालणार असून विरोधकांची मणिपूरवर चर्चा करण्याची इच्छा नाही, विरोधकांना फक्त मणिपूरबाबत राजकारण करायचे आहे, असा आरोपही मोदींनी काँग्रेसवर केला.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT