Kalicharan Maharaj On Rahul Solapurkar Sarkarnama
देश

Kalicharan Maharaj : ‘...तर सोलापूरकर सारख्यांची मुंडकी सर्व हिंदूंनी छाटली पाहिजेत’, कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य

Kalicharan Maharaj On Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यावरून सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण त्यांच्यावर होणाऱ्या टीका काही थांबलेल्या नाहीत.

Aslam Shanedivan

Pune News : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भाजप खासदार उदयराजे भोसले यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया देताना, अशा टोलांना ठेचा, असे म्हटलं होतं. यानंतर आता कालीचरण महाराज यांनी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि ज्या, ज्या महान पुरुषांनी हिंदुत्वाचे रक्षण केले. त्यांचा अपमान करणाऱ्या लोकांची मुंडके सर्व हिंदूंनी छाटली पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. यानंतर मोठा वाध उफाळला होता. यानंतर सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. सोलापूरकर यांनी, शिवप्रेमी नाराज झाले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. शिवरायांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता माझा नव्हता. आणि तसं माझ्या मनात देखील येणार नाही, असे म्हटले होते.

पण छत्रपती शिवाजी महाराज राज्याची अस्मिता असून या वक्तव्यामुळे शिवप्रेमी नाराज झाले होते. सोलापूरकर यांनी तमाम महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती. मात्र सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अद्याप माफी मागितलेली नाही. यावरूनही राज्यात संताप व्यक्त केला जातोय.

अशातच आता कालीचरण महाराज यांनी, अशा लोकांची मुंडके सर्व हिंदूंनी छाटली पाहिजे. तर त्यांच्या मुंडक्यांची माळ काली मातेला घातली पाहिजे. हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड व्हायला हवा. खास करुन ज्या लोकांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतः मुंडकी उतरवावीत आणि जीव द्यावा. यातच हिंदूंच कल्याण असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले आहे

खरी शिवसेना शिंदेंची

दरम्यान कालीचरण महाराज यांनी, शिवसेनेवरून देखील वक्तव्य करताना खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचे म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदूवादी होते. त्यांचा वारसदार कट्टर हिंदूवादी असावा आणि ते एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्यासोबत कट्टर हिंदुत्ववादी आहेत. यामुळेच शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना आहे. तेच बाळासाहेबांचे खरे वारस असल्याचेही कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

जमिनी सनातन धर्माकडे द्या

यावेळी कालीचरण महाराज यांनी, वक्फ बोर्डासंदर्भात देखील कडवड भूमिका घेतली. त्यांनी, हिंदूंसाठी सनातन धर्माची स्थापना झाली पाहिजे. ज्या हिंदूंच्या जमिनी वक्फ बोर्डाने बळकावल्या आहेत. त्या परत कराव्यात. ज्याचे मालक आज हयातीत नाहीत. त्या जमिनी सनातन धर्माकडे दिल्या गेल्या पाहिजेत. त्यांचा उपयोग हिंदूंच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

तर ती खाजगी गोष्टी

तसेच कालीचरण महाराज यांनी संजय राऊत यांनी वर्षा निवासस्थानावरून केलेल्या वक्तव्यावरून देखील भाष्य केलं आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्याप्रमाणे संजय राऊत यांनी बोलले आहे. तंत्र मंत्र असतो, जादूटोणा असतो. यात काही संशय नाही, आणि असं जर कोणी करत असेल तर त्या त्यांची तर ती खाजगी गोष्टी आहे. तर राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT