KS Eshwarappa and Basavaraj Bommai
KS Eshwarappa and Basavaraj Bommai  Sarkarnama
देश

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच ग्रामविकास मंत्र्यांचा राजीनामा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे भाजपच्या (BJP) कर्नाटकातील (Karnataka) मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणाऱ्या संतोष पाटील (Santosh Patil) यांची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये ग्रामविकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) हेच आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते आता राजीनामा देणार आहेत. (Santosh Patil Death Case News)

बेळगावी (Belgavi) येथील संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यासह आणखी दोघांवर संतोष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते.

बेळगावी पोलिसांकडून पाटील यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं. आता त्यांची सुसाईट नोटही पोलिसांना सापडली आहे. तसेच नातेवाईकांनाही तक्रार केल्याने पोलिसांनी ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर ईश्वरप्पा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर ईश्वरप्पा यांनी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. ईश्वरप्पा यांच्या सांगण्यावरून आपल्या गावातील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण त्यांनी खोटेपणा, भ्रष्टाचार, अनियमितता केली, असं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ईश्वरप्पा यांना आपले बील देण्याचे सुचना द्याव्यात, अशी विनंती पाटील यांनी मोदींना केली होती. केलेल्या कामाचे चार कोटी रुपयांचे बील काढण्यासाठी ईश्वरप्पा यांच्याकडून 40 टक्के कमिशन मागितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, ईश्वरप्पा यांनी सुरवातीला सर्व आरोप फेटाळून लावले होते. संतोष पाटील याच्या मृत्यूशी आपला काही संबंध नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्याविरूध्द मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी न्यायालयात लढा द्यायला हवा होता. मी त्यांना कधीच भेटलेलो नाही. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असंही ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केलं होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT