Rahul Gandhi, Priyanka Gandhi, Robert Vadra Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : सोनिया गांधींच्या जावयाचे गुडघ्याला बाशिंग; निवडणूक लढण्याचे संकेत

Rajanand More

New Delhi News : उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कोण असणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ गांधी कुटुंबाचे पारंपरिक मतदारसंघ. पण मागील निवडणुकीत अमेठीत राहुल गांधीचा पराभव झाल्याने पक्षाकडून या वेळी ताकही फुंकून पिले जाणार आहे. अद्याप दोन्ही ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही, तर अमेठीतून प्रियांका गांधींच्या नावाची चर्चा असताना रॉबर्ट वाड्रा यांनी मोठे संकेत दिले आहेत.

अमेठीमध्ये 2019 मध्ये भाजपच्या (BJP) नेत्या आणि विद्यमान खासदार स्मृती इराणींनी (Smriti Irani) राहुल गांधींचा (Rahul Gandhi) पराभव केला होता, तर रायबरेलीमध्ये विजयी मिळवलेल्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) या वेळी निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळे काँग्रेससमोर (Congress) उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न आहे. (Latest Political News)

राहुल गांधी, प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना सोनिया गांधीचे जावई आणि प्रियांका गांधीचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सूचक संकेत दिले आहेत. आपण अमेठीतून निवडणूक लढवावी, अशी लोकांची इच्छा असल्याचे विधान वाड्रा यांनी केले आहे.

वाड्रा (Robert Vadra) म्हणाले, अमेठीतून लोकांना त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मी करावे अशी अपेक्षित आहे. गांधी कुटुंब मागील अनेक वर्षांपासून अमेठी, रायबरेली आणि सुलतानपूरमध्ये मेहनत घेत आहे. सध्याच्या खासदारांमुळे अमेठीतील लोक अडचणीत आले आहेत. विद्यमान खासदारांना निवडून देत चूक केल्याचे त्यांना वाटत आहे, अशी टीकाही वाड्रा यांनी इराणींवर केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, राहुल गांधी हे 2002 पासून अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. मागील निवडणुकीत काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ रायबरेली या मतदारसंघात विजय मिळाला होता. आता हा मतदारसंघही या वेळी धोक्यात आल्याची चर्चा आहे. भाजपने दोन्ही मतदारसंघांत ताकद लावली असल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा लांबत चालल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी यांनी मागीलवेळी अमेठीसह केरळातील वायनाडमधूनही अर्ज भरला होता. अमेठीतून पराभव झाला तरी ते मोठ्या मताधिक्याने वायनाडमध्ये विजयी झाले. कालच त्यांनी पुन्हा वायनाडमध्ये अर्ज दाखल केला. पण अमेठीतून अर्ज भरणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT