Voting Sarkarnama
देश

Lok Sabha Election : सहाव्या टप्प्यात मतदानाचा वेग वाढला, 'या' राज्यात सर्वाधिक मतदान

Roshan More

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज (शनिवारी) मतदान सुरू आहे.आठ राज्यांमधील एकूण 58 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. दिल्लीतील सात , उत्तर प्रदेशातील 14, हरियाणातील 10, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8, ओडिशातील 6, झारखंडमधील 4 आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे. या टप्प्यात आहे. सकाळी 11 पर्यंत देशभरात 25 टक्के मतदान झाले होते. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाले होते.

सकाळपासूनच मतदानासाठी Voting मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी 11 पर्यंत बिहारमध्ये 23.67 टक्के, हरियाणातत 22.9 टक्के, जम्मू कश्मीरमध्ये 23.11 टक्के, झारखंड 27.80 टक्के, दिल्ली 21.69 टक्के, ओडिसा 21.30 टक्के, उत्तर प्रदेशामध्ये UP 27.06 टक्के मतदान झाले आहे.

बंगालमध्ये सर्वाधिक मतदान

सकाळी झालेल्या मतदानाच्या एकुण टक्केवारीमध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 36.88 टक्के मतदान झाले. आत्तापर्यंत देशाचे सर्वाधिक मतदान झालेल्या राज्यांमध्ये पश्चिम बंगालमध्येच सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद आहे. येथे तृणमुल काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या राज्यातील 42 जागा असल्याने भाजपच्या दृष्टिने हे महत्त्वाचे राज्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधींनी बजावला मतदानाचा हक्क

काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावली. नवी दिल्लीतील मतदान केंद्रावर राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी मतदान केले. नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचा उमेदवार नाही. काँग्रेसची आघाडी आपसोबत आहे. या मतदारसंघात आपचे सोमनाथ भारती उमेदवार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT