Amit Shah Sarkarnama
देश

Loksabha Election : तीन टप्प्यांत भाजपला किती जागा? अमित शाहांनी सांगितला आकडा

Roshan More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्याचे मतदान नुकतेच पार पाडले. चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार सुरू आहे. मतदानाची टक्केवारी घसरल्याने नेमका फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू आहे. मात्र, या परिस्थितीत पहिल्या तीन टप्प्यांत भाजपला BJP किती जागा मिळणार याचा थेट आकडाच अमित शाह यांनी सांगितला आहे.

तेलंगणामध्ये अमित शाह Amit Shah यांची जाहीर सभा झाली. या सभेत तेलंगणामध्ये 10 जागा भाजप BJP जिंकणार असल्याचा दावा आहे. पहिल्या तीन टप्प्यांत मिळून भाजप 200 जागा भाजप जिंकणार असल्याचे देखील शाह यांनी ठणकावून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दक्षिणेत चांगले यश मिळेल

पहिल्या तीन टप्प्यांमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमध्ये बहुतेक लोकसभा जागांवर निवडणूक पार पडली. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. दक्षिण भारतात भाजपची ताकद नाही, असे विरोधीपक्ष टीका करतात. मात्र, यंदा भाजपला दक्षिण भारतात चांगल्या जागा मिळतील, असा दावा अमित शाहांनी केला आहे.

रेवंत रेड्डींचे आव्हान

तेलंगणामध्ये भाजपपुढे काँग्रेस मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचे आव्हान आहे. रेवंथ रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीत केसीआर यांना पराभूत करून तेलंगणाची सत्ता मिळवली होती. भाजप चारसौ पारचा दावा करत आहे. त्या दाव्याची देखील खिल्ली रेवंथ रेड्डी यांनी उडवली होती. चारसौ पार करण्यासाठी भाजपला पाकिस्तानाच निवडणूक लढवावी लागेल, असे रेड्डी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT