Kailash Vijayvargiya Sarkarnama
देश

Kailash Vijayvargiya : देशात 30 वर्षांनी गृहयुध्द पेटणार! भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानामुळे वाद...

Rajanand More

Indore : भाजपचे ज्येष्ठ नेते व मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या एका विधानामुळे वाद निर्माण जाला आहे. एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा संदर्भ देत त्यांनी देशात 30 वर्षांनंतर गृहयुध्द सुरू होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.

विजयवर्गीय यांच्या विधानावर काँग्रेसने टीका केली असून माफीची मागणी केली आहे. विजयवर्गीय यांनी रक्षाबंधनाच्या एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, सामाजिक समरसता आज खूप आवश्यक आहे. मी काल-परवा लष्करातील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसोबत बसलो होतो. ते सामाजिक कार्यात खूप सक्रीय असतात. देशात 30 वर्षांत गृहयुध्द सुरू होऊ शकते, असे ते अधिकाऱ्यांनी सांगितले.

अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधताना विजयवर्गीय म्हणाले, काही लोक इंग्रजांचे फूट पाडा आणि राज्य करा, हे धोरण अवलंबत आहे. केवळ खुर्चीसाठी हिंदू समाजात जातीच्या आधारावर तेढ निर्माण केली जात आहे. आपल्याला त्यावर विचार आणि चिंतन करायला हवे. हिंदू शब्द कसा मजबूत होईल, यासाठी आपल्याला काम करायला हवे, असेही विजयवर्गीय यांनी म्हटले होते.

विजयवर्गीय हे भाजपचे राष्ट्रीय महासचिवही होते. त्यामुळे त्यांच्या विधानाला महत्व आले आहे. काँग्रेसचे नेते नीलाभ शुक्ला यांनी यावरून टीका केली आहे. ते म्हणाले, विजयवर्गीय यांचे विधान बेजबाबदार असून त्यांनी माफी मागायला हवी. कोणत्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी गृहयुध्दाची शक्यता व्यक्त केली आहे, त्याला काय आधार आहे, हे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. देशात भीतीचे आणि अस्थिरता निर्माण करणे विधान विजयवर्गीय यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT