Sanjay Raut on Neelam Gorhe Sarkarnama
देश

Sanjay Raut: नीलम गोऱ्हे निर्लज्ज बाई; राऊतांचा हल्लाबोल; 'राजकीय कुंडली'च मांडली... VIDIO पाहा

Sanjay Raut on Neelam Gorhe:"पुण्यात उमेदवारी देताना कुणाकडून किती पैसे घेतले, विधानभवनात लक्षवेधी मांडताना किती पैसे घेतले? असे प्रश्न विचारत राऊतांनी नीलम गोऱ्हे ही निर्लज्ज, विश्वासघातकी बाई आहे," अशा शब्दात संताप व्यक्त केला

Mangesh Mahale

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन दोन्ही शिवसैनिकांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटातील नेते नीलम गोऱ्हे यांच्यावर आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांचा चांगलाच समाचार घेतला.

संजय राऊतांनी नीलमताईंची 'राजकीय कुंडली' मांडली. "पुण्यात उमेदवारी देताना कुणाकडून किती पैसे घेतले, विधानभवनात लक्षवेधी मांडताना किती पैसे घेतले? असे प्रश्न विचारत राऊतांनी नीलम गोऱ्हे ही निर्लज्ज, विश्वासघातकी बाई आहे," अशा शब्दात संताप व्यक्त केला. नीलमताईंवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली.

त्यांचे कर्तृत्व काय आहे, त्यांना साहित्य संमेलनातील चर्चासत्रात बोलावलं? असा विचारणा राऊतांनी संमेलनाचे संयोजक सरहद्दचे संजय नहार यांचे नाव न घेता केली. नीलम गोऱ्हेंचे विधान ही विकृती आहे. त्यांना चारवेळा आमदार केले. तरी जाताना ताटात घाण करून गेल्या, असे म्हणत राऊतांनी गोऱ्हेंवर घणाघात केला.

"साहित्य महामंडळ हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्यक्रम ठरवते, आयोजक हे सतरंज्या उचलायला असतात. उषा तांबेंनी संमेलनाचे कार्यक्रम ठरवले. त्यांचे पती बांधकाम विभागाचे सचिव होते. हे सगळ्यात भ्रष्ट खाते आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ही कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये. काही लोकांच्या मर्जीखातर त्या आल्या, गेल्या आणि जाताना ताटात घाण करुन गेल्या," असे राऊत म्हणाले.

दिल्लीतील साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन नव्हते. संमेलनात मराठी भाषा, संस्कृती यावर चर्चा व्हायला पाहिजे. याठिकाणी राजकीय चिखलफेक झाला. महाराष्ट्रातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्यावर चिखल फेकण्यासाठी तुम्ही साहित्य संमेलन भरवलं का? साहित्य महामंडळ ही भष्ट्राचारी संस्था आहे. जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत," असा आरोप राऊतांनी केला.

नीलम गोऱ्हे यांच्यावर उपसभापती म्हणून नाही तर मी व्यक्ती म्हणून टीका केली आहे. मी २४ वर्षे राज्यसभेत आहे. सर्व कायदे आम्हालाही माहीत आहेत. आम्ही हक्कभंग पाहिला आहे. कारागृहात गेलो आहे. आता अधिवेशन सुरु नाही. त्या कशाला हक्कभंग करतील. खरंतर महाराष्ट्राने त्या बाईवर हक्कभंग आणला पाहिजे. त्या विश्वासघातकी बाई आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT