New Delhi News : केंद्रातील एनडीए सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांची वजन चांगलंच वाढल्याचं दिसून येत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (ता.1) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना खूश ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदी सरकारनं केल्याचं दिसून येत आहे.पण केंद्र सरकारनं बिहारसाठी उदारपणा दाखवण्यापाठीमागं मुख्यमंत्री नितीश कुमारांनी आठवड्याभरापूर्वी मणिपूरमध्ये जी चाल खेळली ती यशस्वीठरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रातील एनडीए सरकारचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाचे प्रमुख नेते नितीश कुमार यांनी मणिपूरमधील भाजप सरकारचा पाठिंबा काढल्याची घोषणा केली होती. मात्र,त्यानंतर या निर्णयाला जबाबदार धरत तेथील जेडीयूच्या प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सिंह यांच्यावर मोठी कारवाई करत त्या पदावरुन उचलबांगडीही केली होती.पण जेडीयूचा हा निर्णय केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारसाठी मोठा इशारा मानला गेला.
आगामी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मणिपूरमधील तीच खेळी जेडीयू आणि बिहारच्या चांगलीच पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. यावर्षीच्या अखेरीस होत असलेल्या बिहार विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवत केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2025) मोदी सरकारकडून बिहारसाठी अक्षरश: घोषणांचा पाऊस पाडला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खूश करण्यासोबतच बिहारमधील मतांवर डोळा ठेवल्याची चर्चा आहे. याचमुळे ग्रीनफिल्ड विमानतळ, मखाना बोर्ड आणि पटना आयआयटीचा विस्तार या प्रमुख घोषणांचा समावेश आहे.मिथिलांचलमधील ‘वेस्टर्न कॉस्ट कॅनॉल’ प्रकल्पाचाही घोषणा केली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारमध्ये शेतकरी वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान,उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ही संस्था संपूर्ण पूर्व भागातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना बळकट करणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारून त्यांचे उत्पन्न वाढवतील. या संस्थेमुळे युवकांना कौशल्य, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
आठवडाभरापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचारानं धगधगत राहिलेल्या मणिपूरमध्ये भाजपला मोठा धक्का दिला होता. मणिपूरमधील हिंसाचारामुळे आधीच केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकार बॅकफूटला गेल्यानंतर विरोधकांचा दबाव वाढतोच आहे.अशातच नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय केंद्र सरकारमधील मोदी- शाहांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.