Pune News : बिहारमधील नितीश कुमार सरकारचा अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सध्या जोरदार तयारी केली जातेय. दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदलाच्याही चर्चा सुरू झाल्या असतानाच भाजपच्या एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. यामुळे बिहारमध्ये राजकीय भूकंप आला असून आज बुधवार (ता.26) संध्याकाळी किंवा गुरुवारी (ता.27) सकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
एकीकडे बिहार मंत्रिमंडळ विस्ताराचा विस्तार होईल अशा चर्चांना उधाण आले असतानाच मात्र राजभवनात कोणतीही तयारी दिसत नाही. सध्या भाजपच्या धोरणानुसार 'एक व्यक्ती, एक पदा'नुसार, भारतीय जनता पक्षाचे बिहार प्रदेशाध्यक्ष पद दिलीप जयस्वाल यांच्याकडे आहे. तसेच ते सध्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात आहेत. याच कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याच जागी, आता एका चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळेच आता नितीश यांच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दिलीप जयस्वाल यांच्या राजीनाम्याची माहिती राजभवनाला देण्यात आली आहे. तसेच नवीन सदस्यांच्या शपथविधीसाठी राज्यपालांकडून वेळ मागण्यात आला आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
बिहार विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. याआधीच, 25 फेब्रुवारी रोजी अचानक नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि अधिवेशनाचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी आपला राजीनामा दिला. यावेळी त्यांनी, 'एक व्यक्ती, एक पद' या सूत्रानुसार आपण राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. तर राजीनामा दिल्याने त्यांना, संघटनेसाठी काम करता येईल असेही त्यांनी सांगितले होते.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये नवीन मंत्र्यांच्या नियुक्तीची प्रक्रियाही सुरू आहे. जयस्वाल यांच्या राजीनाम्यानंतर, मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यासह आणखी काहींना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. पण नितीश कुमार नवीन चेहऱ्याला संधी देणार की वेगळी रणनीतीवर काम करणार हे पाहावं लागणार आहे.
सध्या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खाती आहेत. त्यांच्यामध्येही फेरबदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये बिहार भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची पक्षातूनच मागणी होत होती.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, यावेळी नितीश सरकारमध्ये पाच ते सहा नवीन चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. या विस्तारात भाजप कोट्यातून तीन ते चार आणि जेडीयू कोट्यातून एक ते दोन जणांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाऊ शकते. दरम्यान, जितन राम मांझी यांचा पक्षही आणखी एका मंत्रिपदाची मागणी करत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात जातीय समीकरणांवर विशेष लक्ष दिले जाऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.