Indian Air Force
Indian Air Force Sarkarnama
देश

भारतीय अलर्टवर; पंतप्रधान मोदींनी हवाई दलाला दिले आदेश

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमधून (Kyiv) तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दुतावासाकडून (Indian Embassy) अडकलेल्या भारतीय नागरिकांना करण्यात आले आहे. मिळेल त्या वाहनाने कीव सोडा, असं दुतावासाकडून स्पष्ट करण्यात आल्यानं भीती वाढत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय हवाई दलाला (Indian Air Force) आदेश दिले आहेत.

कीवमध्ये रशियाकडून (Russia) हल्ला केला जाण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. अजूनही अनेक विद्यार्थी कीवमध्ये अडकले आहेत. पण दुतावासाच्या आवाहनामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या भारतातील कुटुंबीयांचीही चिंता वाढली आहे. मागील सहा दिवसांपासून केंद्र सरकाकडून भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एअर इंडिया व इतर खासगी विमान कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास दीड हजार नागरिक परत आले आहेत.

युक्रेनमधील स्थिती अधिकच विदारक होत चालल्याने आता ऑपरेशन गंगा (Operation Ganga) या मोहिमेचा वेग वाढवला जाणार आहे. त्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत हवाई दलाला आदेश दिले आहेत. त्यानुसार हवाई दलाची सी-17 ही विमाने आज रवाना होऊ शकतात. या विमानांमध्ये एकावेळी 400 नागरिक बसू शकतात. तसेच इतर मदतसाहित्यही नेले जाऊ शकते.

दरम्यान, भारताने आतापर्यंत सात विमानांमधून जवळपास दीड हजार नागरिकांना मायदेशी परत आणले आहे. तसेच जवळपास आठ हजारांहून अधिक भारतीयांना युक्रेन सोडलं आहे. अजूनही अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांनी सुरक्षित शहरांमध्ये जाण्याचे आवाहन यापूर्वीच दुतावासाकडून करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच युक्रेन सरकारने पश्चिम भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. पण आता दुतावासाच्या आवाहनामुळे भारतीयांनाही या युध्दाचा धोका वाढल्याचे संकेत मिळत आहेत.

युक्रेनची राजधानी कीववर रशियाकडून आक्रमण केले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियन सैन्याचा मोठा ताफा कीवच्या दिशेने निघाला आहे. त्यानंतर मंगळवारी दुपारी बारा वाजता भारतीय दुतावासाने ट्विट करून याबाबतचे आवाहन केले आहे. 'विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांनी रेल्वे किंवा इतर कोणत्याही उपलब्ध माध्यमातून कीव सोडावे,' असं त्यात म्हटले आहे.

दुतावासाने हे आवाहन केले असले तरी सध्या कीवमधील स्थिती बाहेर पडण्यासाठी चांगली नसल्याचे चित्र आहे. अनेक विद्यार्थी रेल्वेस्थानकांत अडकून पडले आहेत. त्यांना स्थानिकांकडून रेल्वेमध्ये घेतले जात नसल्याचा दावा काही विद्यार्थ्यांनी केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. रेल्वे स्थानकांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. आपल्याला इथून बाहेर काढण्याचे आवाहन विद्यार्थ्यांकडून केले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT