Election Commission, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Election Commission News : राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानेच केला धक्कादायक खुलासा; FIR ची दिली माहिती...

Rahul Gandhi’s Allegations Against Election Commission 2023 : मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघात मते डिलीट करण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाल्याचे मात्र आयोगाने मान्य केले आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. राहुल गांधी यांनी 12 हजार मते वगळल्याचा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केला, मात्र आयोगाने हे आरोप चुकीचे आणि आधारहीन ठरवत नाकारले.

  2. आयोगाने स्पष्ट केले की कोणतेही मत ऑनलाईन पद्धतीने डिलीट केले जाऊ शकत नाही, तरी 2023 मध्ये आळंद मतदारसंघात काही अयशस्वी प्रयत्न झाले होते आणि त्यावर एफआयआर दाखल केला आहे.

  3. राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मोबाईल नंबर व सॉफ्टवेअर वापरून नावे वगळली जात असल्याचा आरोप केला, आणि त्याचे उदाहरण देण्यासाठी संबंधित नागरिकांना पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

Shocking Disclosure on Voter List Deletion in Aland : मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी पुन्हा एकदा भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले. दोन मतदारसंघातील सुमारे 12 हजार मते वगळल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर काही मिनिटांतच आयोगानेही त्यावर खुलासा केला आहे.

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद सुमारे पाऊण तास चालली. त्यानंतर अर्ध्या तासांतच निवडणूक आयोगाने सोशल मीडियात पोस्ट करत राहुल यांचे आरोप खोडून काढले. हे आरोप चुकीचे आणि निराधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे. ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नावे वगळली जाऊ शकत नसल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

आयोगाने काय केला खुलासा?

आयोगाने सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे आणि आधारहीन आहेत. कोणतेही मतदारांची नावे ऑनलाईन डिलीट केले जाऊ शकत नाही. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे, सर्वसामान्य लोक असे करू शकत नाहीत.

2023 मध्ये आळंद विधानसभा मतदारसंघात मतदारांची नावे डिलीट करण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाल्याचे मात्र आयोगाने मान्य केले आहे. याप्रकरणी आयोगाने स्वत:हून एफआयआर दाखल केली आहे. आयोगाच्या रेकॉर्डनुसार 2018 मध्ये आळंद मतदारसंघातून भाजपचे सुभाष गुट्टेदार जिंकले होते आणि 2023 मध्ये काँग्रेसचे बी. आर. पाटील विजयी झाले आहेत.

राहुल गांधींनी काय केलेत आरोप?

कर्नाटकातील मतचोरीचे प्रकरण एका बीएलओच्या मार्फत पकडण्यात आले आहे. त्यांच्या नातेवाईकाचेच नाव वगळण्यात आले होते. बीएलओने याची माहिती घेतली तेव्हा समोर आले की, नातेवाईकाचे मत त्याच्याच शेजाऱ्याने डिलीट केले. त्यांनी शेजाऱ्याकडे विचारणा केल्यानंतर आपण हे केले नसल्याचे त्याने सांगितले. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर समोर आले की, कोणीतरी तिसऱ्यानेच सेंट्रलाईज माध्यमातून हे काम केले होते, असा दावा राहुल यांनी केला आहे.

काही व्यक्तींच्या मोबाईलचा वापर करून मतदारांची नावे वगळली जात आहेत. मात्र, याबाबत संबंधितांना काही माहिती नसल्याचे राहुल यांनी सांगितले. कर्नाटकातील सूर्यकांत नावाच्या व्यक्तीलाही त्यांनी पत्रकार परिषदेत आणले. त्यांनी स्वत:च आपल्या नावाचा आणि मोबाईल नंबरचा वापर करून 12 जणांची नावे वगळण्यात आल्याचे यावेळी सांगितले. नाव वगळण्यात आलेली महिला मतदारही यावेळी उपस्थित होती.  

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: राहुल गांधींनी काय आरोप केले?
A: दोन मतदारसंघातील १२ हजार मते सॉफ्टवेअर आणि मोबाईल वापरून वगळल्याचा दावा केला.

Q2: निवडणूक आयोगाने काय उत्तर दिले?
A: आरोप चुकीचे असून कोणतेही मत ऑनलाईन डिलीट केले जाऊ शकत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

Q3: आयोगाने काही घटना मान्य केल्या का?
A: होय, २०२३ मध्ये आळंद मतदारसंघात मत वगळण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाले होते.

Q4: पुढे काय कारवाई झाली?
A: निवडणूक आयोगाने स्वतःहून एफआयआर दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT