Narendra Modi, mohan Bhagwat, Sanjay Raut.jpg Sarkarnama
देश

Mohan Bhagwat: 'पंच्याहत्तरीची शाल अंगावर...' भागवतांचे विधान मोदींच्या VRS बाबत नव्हे, तर 'या' व्यक्तीबाबत..RSSचे स्पष्टीकरण

Mohan Bhagwat Statement VRS PM Modi RSS Clarification:  खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींना “व्हॉलेंटरी रिटायरमेंट” घेण्याचा सल्ला दिला. पण त्याचवेळी त्यांनी अमित शाह यांच्या निवृत्तीच्या योजनेविषयी समाधान व्यक्त केले.

Mangesh Mahale

75 वर्षांनंतर निवृत्त व्हावे, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी नुकतेच केले आहे. त्यांच्या या विधानाचा संबध पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांच्या सेवानिवृत्तीशी विरोधकांना जोडला. मोदींनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे, असा संकेत आरएसएसने दिला असल्याचा दावा विरोधक करीत आहेत. त्यावर आता आरएसएसने (RSS) स्पष्टीकरण दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबर महिन्यामध्ये 75 वर्षांचे होत आहेत. 75 वर्षांची शाल पांघरली की रिटायर्ड व्हायला हवे, असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले. भागवतांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिमटा काढायची संधी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतली. खासदार संजय राऊत यांनी मोदींना “व्हॉलेंटरी रिटायरमेंट” घेण्याचा सल्ला दिला. पण त्याचवेळी त्यांनी अमित शाह यांच्या निवृत्तीच्या योजनेविषयी समाधान व्यक्त केले.

आरएसएसने मात्र मोहन भागवत यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या 75 व्या जन्मदिवस कार्यक्रमात हे विधान केले आहे. पण काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याचा आपल्या पद्धतीने अर्थ लावला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान हे फक्त मोरोपंत पिंगळे यांच्याबाबत होते, अन्य व्यक्तींबाबत त्याचा संबध नाही, असे संघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर’ या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरात झाले. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी केलेल्या “पंचहात्तरीची शाल पडली की थांबावं” या विधानामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले होते मोहन भागवत

भाषणात भागवतांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “मोरोपंत एकदा म्हणाले होते, पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की तिचा अर्थ असा की आता थांबावं, तुमचं वय झालं आहे. बाजूला व्हा आणि दुसऱ्यांना काम करू द्या.” त्यांच्या विधानानंतर अनेकांनी त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. संघाच्या अंतर्गत प्रक्रियेत नेतृत्व बदल, जबाबदाऱ्यांची पिढीगत अदलाबदल अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे विधान होते का, हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT