Supreme Court hearing News
Supreme Court hearing News Sarkarnama
देश

Supreme Court : सिब्बलांच्या युक्तीवादावर शिंदे गटाचा आणि मेहतांचा जोरदार आक्षेप; न्यायालयात काय घडले?

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court hearing : सत्तासंघर्ष प्रकरणात आज ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) युक्तिवाद केला. बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर कपिल सिब्बल यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला आहे. आता ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी युक्तीवाद करणार आहेत.

सिब्बलांचा युक्तिवाद संपला...

या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचे संरक्षण करण्याचा आहे. एडीएम जबलपूरसारखे काही वेगळे प्रसंग आले आहेत. मात्र, त्याच प्रकरणाइतकेच हे प्रकरण महत्त्वाचे व प्रभाव पाडणारे आहे. हा या न्यायालयाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा क्षण आहे, जेव्हा लोकशाहीचे भवितव्य ठरवले जाणार. मला खात्री आहे, की न्यायालयाने जर मध्यस्थी केली नाही, तर आपण आणि आपली लोकशाही धोक्यात येईल. कोणतेच सरकार अशाप्रकारे टिकू दिले जाणार नाही. या आशेवर मी युक्तिवाद संपवतो, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा, आपल्या युक्तीवादाचा असा भावनीक शेवट, कपिल सिब्बल यांनी केला आहे.

लंचब्रेकनंतर न्यायालयात काय घडले?

लंचब्रेकनंतर न्यायालयात अनेक घटना घटल्या आहेत. कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाचे वकील निरज किशन कौल यांनी त्यांच्या युक्तीवादावर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनीही हस्तक्षेप केला. त्यांनीही सिब्बल यांच्या युक्तीवादावर आक्षेप घेतला. सिब्बल यांनी राज्यपालांचे जे पत्र दिले आहे, त्यावर मला मत मांडायचे असल्याचे मेहता म्हणाले.

त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, तुमही एक मोट द्या, असे तुषार मेहता यांना सांगितले. त्यानंतर निरज किशन कौल युक्तीवाद करत आहेत. ते आपल्या युक्तीवादात म्हणाले, पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष असतो. मेहता म्हणाले, नेत्याची निवड विधीमंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाते. या माध्यमातून त्यांनी कपिल सिब्बल यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, नेत्याची नियुक्ती विधीमंडळ पक्षाकडून केली जाते, असा युक्तिवाद करता येणार नाही. त्यातून संसदीय लोकशाही धोक्यात येईल. आपल्याला दहाव्या शेड्यूलमध्ये परत जावे लागेल. दहाव्या शेड्यूलमध्ये दोन घटक असतात. एक म्हणजे निषिद्ध नकारात्मक कोड- तुम्ही काय करू नये. पण एक सकारात्मक कोडही आहे. दहावे शेड्यूल काय करते ते म्हणजे ते नकारात्मक आणि सकारात्मक यांच्यात संतुलन राखते, असा जोरदार युक्तीवाद सिंघवी यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT