Amit Shah, AmarinderSingh
Amit Shah, AmarinderSingh 
देश

काँग्रेसपासून फारकत घेतलेले कॅप्टन अमरिंदरसिंग ठरणार भाजपची 'बी टीम'

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांनी थेट गांधी कुटुंबावरच हल्लाबोल केला होता. तसेच, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनाही त्यांनी थेट आव्हान दिले होते. आता त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, ते भाजपची बी आहेत, अशी टीका आताच होऊ लागली आहे.

कॅप्टन यांच्या पक्षस्थापनेच्या हालचालींना पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी अकाली दलाचे विविध गटांना सोबत घेण्यासाठी पावले उचलली आहेत. असे असले तरी सर्वच राजकीय पक्ष याबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत. शिरोमणी अकाली दलाचे (संयुक्त) नेते सुखदेव धिंडसा आणि त्यांचे पुत्र परमिंदर धिंडसा यांनी अद्याप कॅप्टन यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे म्हटले आहे. परंतु, कॅप्टन यांनी अधिकृतरीत्या काँग्रेस सोडावी, अशी अटही त्यांनी घातली आहे.

शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या व माजी केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल यांनी कॅप्टन हे भाजपची बी टीम असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाचे अधिकारक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास अर्धा पंजाबच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे. यावरुन पंजाबमधील वातावरण तापले आहे. याला कॅप्टन जबाबदार असल्याचा दावाही बादल यांनी केला आहे.

अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रविन ठुकराल यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. अमरिंदरसिंग यांनी अजून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. पण त्यांनी यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. ठुकराल यांनी ट्विट करत त्याबाबत स्पष्ट संकेत दिले. 'पंजाबच्या भविष्याची लढाई आता सुरू झाली आहे. पंजाबमधील लोकांच्या सेवेसाठी तसेच मागील वर्षभरापासून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या राजकीय पक्षाची घोषणा लवकरच केली जाईल,' असे ठुकराल या ट्विटमध्ये करण्यात आलेली आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत तोडगा निघाल्यास भाजपसोबत जागावाटप केले जाईल, असं अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच समविचारी पक्षांशीही आघाडी केली जाईल. त्यामध्ये अकाली दलातून फुटलेले काही गट प्रामुख्याने धिंडसा आणि ब्रम्हपुरा आदी गटांची नावे घेत त्यांनी काँग्रेस व अकाली दलाविरोधात दंड थोपडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT