Delhi CM Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : ...त्यांनी खूप चलाखी केली! सुप्रीम कोर्टात केजरीवालांच्या जामिनाला 'ईडी'चा कडाडून विरोध

Rajanand More

New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांच्या अटकेविरोधात आणि अंतरिम जामिनाबाबत आज सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी झाली. मात्र, कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. केजरीवाल यांच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी आणि ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जोरदारपणे बाजू मांडली. याचिका करताना केजरीवालांनी चलाखी केल्याचे मेहता म्हणाले. तसेच त्यांनी जामिनाला जोरदार विरोध केल्याने कोर्टाला निकाल राखून ठेवावा लागला.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी (Delhi Liquor Scam Case) ईडीने मागील महिन्यात केजरीवालांना अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बेकायदेशीरपणे ही अटक करण्यात आल्याचा दावा केजरीवालांच्या वतीने कोर्टात (Supreme Court) करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून केजरीलांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. आज त्यावर अंतिम सुनावणी झाली. (Lok Sabha Election 2024)

न्यायाधीश संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. केजरीवालांच्या जामिनाला मेहतांनी विरोध केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हटले की, ‘आम्ही अंतिम आदेशापुर्वी नेहमीच अंतरिम आदेश देतो.’ त्यावर मेहता म्हणाले, या लोकांनी (मुख्यमंत्री केजरीवाल) खूप चतुरतेने याचिका दाखल केली आहे. अटकेला आव्हान देणारी याचिका आहे, पण त्यामध्ये जामिनाचीही मागणी करण्यात आली आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोर्टाने त्यावर म्हटले की, ते राजकीय व्यक्ती आहेत की नाही, याबाबत आम्ही बोलत नाही. ही केस योग्य आहे की नाही, यावर बोलत आहोत. असाधारण प्रकरणात जामीनावर विचार केला जाऊ शकतो की नाही? याचिकाकर्त्याला दिलासा हवा असेल तर आम्ही त्यावर विचार का करू नये?

सध्या लोकसभा निवडणूक आहे, ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे जामिनाचा विचार केला जाऊ शकतो. ही निवडणूक पाच वर्षांतून एकदा असते, असे कोर्टाने म्हटल्यानंतर कोर्टाच्या या भूमिकेवर मेहतांनी पुन्हा जामिनाला जोरदार विरोध केला. असे असेल तर तुम्हाला प्रत्येकाच्या याचिकेवर विचार करावा लागेल. मग तो कोणत्याही समूहातील असो. अरविंद केजरीवालांनी कोणत्याही फाईलवर सही केलेली नाही. कारण त्यांच्याकडे कोणतेही मंत्रालय नाही. केवळ नियुक्तीवर सही करत होते. मुख्यमंत्र्यांची जी जबाबदारी आहे, तेच हे करतात.

दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला. पुढील दोन दिवसांत कोर्टाकडून जामिनावर निकाल दिला जाऊ शकतो. दिल्लीत पुढील टप्प्यांत निवडणूक होणार आहे. त्यामुळे केजरीवालांना प्रचारासाठी जामीन मिळाल्यास आपला फायदा होऊ शकतो.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT