Nirmala Sitharaman, Narendra Modi Sarkarnama
देश

Union Budget 2024 : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातील 'या' आहेत मोठ्या घोषणा; शेतकरी,महिला अन् तरुणांना काय मिळालं?

Modi GovtUnion Budget 2024 : तरुणांचा कौशल्य विकास, शिक्षण, कृषी आणि रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रांवर त्यांनी अर्थसंकल्पात विशेष भर दिला. तसंच विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी हा अर्थसंकल्प देशासाठी योग्य आणि संतुलित असल्याचं म्हटलं आहे.

Jagdish Patil

Nirmala Sitharaman Union Budget 2024 Speech : लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्ता स्थापन केलेल्या एनडीएप्रणित मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (ता. 23 जुलै) सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी महिला, शेतकरी, तरूण वर्गासह रोजगारासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

तरुणांचा कौशल्य विकास, शिक्षण, कृषी आणि रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रांवर त्यांनी अर्थसंकल्पात विशेष भर दिला. तसंच विरोधकांनी या अर्थसंकल्पावर टीका केली तर सत्ताधाऱ्यांनी हा अर्थसंकल्प देशासाठी योग्य आणि संतुलित असल्याचं म्हटलं आहे.

निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. या अर्थसंकल्पात सध्या एनडीए आघाडीला पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे. यावरुन आता विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. शिवाय नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना घाबरुन सरकारने हा अर्थसंकल्प जाहीर केल्याचं विरोधकांकडून म्हटलं जात आहे.

बिहार आणि आंध्र प्रदेशवर मोदी सरकार मेहरबान

अर्थसंकल्पात चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटी तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी (Bihar) 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांसाठी आजच्या अर्थसंकल्पात विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.

रोजगार निर्मिती

या अर्थसंकल्पात (Union Budget) शिक्षण, कृषी, रोजगार निर्मिती आणि तरुणांचा कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. देशाच्या पूर्वेकडील राज्यांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. आज अर्थमंत्र्यांनी 12 औद्योगिक उद्यानांची घोषणा केली आहे.

तरुणांसाठी 5 योजना

दोन लाख कोटी रुपयांच्या तरतुदीसह तरुणांसाठी 5 योजनांची घोषणा करण्यात आली आहे. याचा 5 कोटींहून अधिक तरुणांना फायदा होणार आहे. तसेच रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 विशेष योजनांची घोषणा करण्यात आली आहे.

मुद्रा लोन

मुद्रा लोनची मर्यादा वाढवली असून आता या योजनेंतर्गत 10 ऐवजी 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

शेती

शेती आणि शेतीशी संलग्न असलेल्या क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा फायदा शेतऱ्यांना होईल. ज्यामुळे 6 कोटी शेतकरी जमीन नोंदणीच्या कक्षेत येतील. तसेच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन करुन बदलत्या हवामानानुसार पिकांचा विकास करण्यावर जोर देण्यात आला आहे.

ग्रामीण विकास

ग्रामीण विकासासाठी सरकारने 2.66 लाख कोटींची तरतूद केली आहे.

बिहारला 3 एक्सप्रेस वे

या अर्थसंकल्पात पूर्वेकडील राज्यांसाठी ज्यादाचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये बिहारच्या वाट्याला 3 एक्सप्रेसवे आले आहेत. तर 26 हजार कोटी रुपये खर्चून नवे रस्ते बांधले जाणार आहेत. शिवाय गयामध्ये इंडस्ट्रियल हब बनवण्यात येणार आहे.

EPFO

या अर्थसंकल्पात प्रथमच कर्मचाऱ्यांना EPFO ​​मध्ये त्यांच्या योगदानानुसार प्रोत्साहन देण्याची घोषणा केली. ज्याचा 30 लाख तरुणांना फायदा होणार आहे. प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी, कंपन्यांना 2 वर्षांसाठी दरमहा 3-3 हजार रुपये मिळणार आहेत.

फॉर्मल सेक्टरमधील करणाऱ्यांना लाभ

फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत 15,000 रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी एक लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी पात्र ठरतील. 2 लाखांपेक्षा जास्त तरुणांना याचा फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT