Narendra Modi Speech Sarkarnama
देश

Narendra Modi Speech : दोन कोटी महिलांना लखपती बनवणार; नरेंद्र मोदींची नवी घोषणा!

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : देशभरात आज ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्या दिनानिमित्त लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आला. यानंतर लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशवासीयांना संबोधित केले. मोदी म्हणाले, "मणिपूरमध्ये (Manipur Violence) आता शांतता आहे. आज देशातील तरुण जे काही करतील, त्याचा देशावर 1000 वर्षे प्रभाव पडेल. युवाशक्तीमध्ये क्षमता असून ती मजबूत करण्याची आमची धोरणे आहेत." (Latest Marathi News)

आपल्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. आज भारत जगाला अभिमानाने सांगू शकतो की, सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहेत. 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. महिला शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे मोदी म्हणाले.

मणिपूरवर भाष्य -

नरेंद्र मोदी म्हणाले, "मणिपूरमध्ये मागील दोन- तीन महिने हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता मात्र मणिपूरमध्ये शांतता आहे. राज्य आणि केंद्र सरकार समस्या सोडवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. यापुढेही राज्याला उभारी देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार आहे."

एक हजार वर्षांची गुलामगिरी -

"1 हजार वर्षांची गुलामगिरी आणि पुढील 1 हजार वर्षांची भव्यता यांच्यामध्ये भारत उभा आहे. आज जी कथा लिहिली जाईल, ती पुढील 1 हजार वर्षांचा पाया असणार आहे. त्यांना बळ देण्याची आमची धोरणे आहेत. भारताची युवा शक्ती पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. भारत तंत्रज्ञानाच्या जगात मोठी शक्ती बनला आहे भारताच्या डिजिटल इंडियाच्या यशाबद्दल संपूर्ण जग आमचे कौतुक करत आहे," असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT