Nirmala Sitharaman Sarkarnama
देश

Nirmala Sitharaman : टॅक्स शून्यावर आणण्याची माझी इच्छा, पण..! निर्मला सीतारमण यांनी सांगितली अडचण

Rajanand More

New Delhi : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्राप्तिकराविषयी मंगळवारी मोठं विधान केले आहे. सलग सातवेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. प्रत्येकवेळी प्राप्तिकर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न त्यांच्यासमोर येतो. पण टॅक्स कमी करता येत नसल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केली आहे.

टॅक्स कमी न झाल्याने निर्मला सीतारमण सोशल मीडियातही ट्रोल होत होत्या. तसेच विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सीतारमण यांनी भोपाळ येथे आपली अडचण सांगितली. त्या म्हणाल्या, टॅक्स शुन्यावर आणावा, अशी माझी इच्छा आहे. पण देशासमोरील आव्हानांमुळे हे करता येत नसल्याचा हवाला त्यांनी दिला.

भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) दीक्षांत समारंभामध्ये त्यांनी हे विधान केले आहे. अनेकदा अर्थमंत्री म्हणून अशीवेळ येते की, लोकांना मला टॅक्सबाबत उत्तरे द्यावी लागतात. आपली करप्रणाली अशी का आहे, कर यापेक्षा कमी होऊ शकत नाही का, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मला तर कर शून्य असावा असे वाटते. पण देशासमोरील आव्हाने पार करून आपल्याला पुढे जायचे असल्याचे सीतारमण यांनी सांगितले.

दरम्यान, सीतारमण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प मागील महिन्यात सादर केला. त्यानुसार कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यावरून विरोधकांकडून बरीच टीका करण्यात आली होती. नवीन करप्रणालीनुसार कर भरणाऱ्यांना काही दिलासा देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT