Samajwadi Party Rally
Samajwadi Party Rally Sarkarnama
देश

सात आमदार पक्षात आले अन् अडीच हजार जणांवर झाला गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) तोंडावर भाजपच्या तीन मंत्र्यांसह सात आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यापैकी काही आमदारांनी शुक्रवारी समाजवादी पक्षात प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. पण आता हे स्वागतच वादात अडकले असून पोलिसांनी तब्बल अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या पक्षप्रवेशाने पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजपला (BJP) धक्के देत समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) मोठी आघाडी घेतली आहे. पण शुक्रवारी कार्यालयासमोर झालेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. समाजवादी पक्षाकडून या कार्यक्रमाला व्हर्चुअल सभा असं नाव दिलं होतं. पण प्रत्यक्षात या कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यामध्ये कोरोनाच्या (Covid19) नियमांचे पालनही करण्यात आले नाही. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) 15 जानेवारीपर्यंत सभा न घेण्याचे सुचना दिल्या आहेत. पोलिसा आयुक्त डी. के. ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाच्या अडीच हजार नेत्यांना गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. कलम 144 व महामारी कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी या कार्यक्रमाचे शुटींग केले असून त्यानंतरच गुन्हा नोंदवला असल्याचे ठाकुर यांनी स्पष्ट केलं.

गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजवादी पक्षाकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, भाजपकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, समाजवादी पक्षाने कोरोना काळात निवडणूक आयोगाच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन केले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला, असे ते म्हणाले. लखनौचे जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश म्हणाले, या कार्यक्रमासाठी सपाकडून कसलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. या कार्यक्रमाची आम्हाला माहिती मिळाल्यानंतर पोलीस तिथे दाखल झाले. यानंतर आता पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शुक्रवारी माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya), धरम सिंग सैनी यांच्यासह पाच आमदारांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. मागील चार दिवसांत या नेत्यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. आणखी काही मंत्री व आमदार भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीत मागील दोन उमेदवारांच्या नावांवर बैठकांचे सत्र सुरू असताना राज्यात नेते पक्ष सोडून जात होते. सर्वांनीच अखिलेश यांचा हात धरल्याने भाजपला धक्का बसला आहे. कारण या निवडणुकीत भाजप व समाजवादी पक्षातच थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT