Prithviraj Chavan, Narendra Modi
Prithviraj Chavan, Narendra Modi sarkarnama
कोल्हापूर

Sangali : देशाच्या विभाजनाचा मोदी सरकारचा डाव : पृथ्वीराज चव्हाण

Umesh Bambare-Patil

कडेगांव : मोदी सरकार देशात जातीयता व धर्मांधतेचे विष पेरत असून, देशाचे विभाजन करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी राहुल गांधी भारत जोडो यात्रा करीत आहेत. तेव्हा देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही, घटना, संविधान वाचविण्यासाठी व सर्वधर्म समभाव टिकविण्यासाठी 'भारत जोडो' यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे भारत जोडो यात्राअंतर्गत कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार भाई जगताप, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते.यावेळी आमदार भाई जगताप, माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार मोहनराव कदम, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम आदी उपस्थित होते.

आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘राज्याला व देशाला लागलेले ग्रहण यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रेच्या मातीतून घालवायचे आहे. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. यापासून जनतेची सुटका करण्यासाठी राहुल गांधींची दुसरी स्वातंत्र्य लढाई सुरू आहे. या भारत जोडो यात्रेमध्ये जिल्ह्यातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतील.’

सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले, ‘देशात आता जात व धर्म विचारला जात असून, स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर भारत एकत्र आला पाहिजे, माणसे एकत्र आली पाहिजेत. यासाठीच राहुल गांधी बाहेर पडले आहेत. देश जोडण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन भारत जोडो यात्रा यशस्वी करावी.’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT