Eknath Shinde-Aditya Thackeray sarkarnama
महाराष्ट्र

Aditya Thackeray : 'आज जागतिक खोके दिवस साजरा होतोय', आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

Roshan More

Aditya thackeray News : महायुती सरकारला आज (रविवारी) दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून आपल्या भावना केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत. मात्र, सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 'आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे.', असे म्हणत आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

निर्लज्जपणे आज खोके दिवस साजरा केला जातोय. जे घाबरट आहेत, डरपोक आहेत. ते पक्ष चोरतात. वडील चोरतात. स्वत:च्या बॅनरवर दुसऱ्यांचे वडील यांना लागतात. हे अशी लोक आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

उद्धव ठाकरेंची टीका

आदित्य ठाकरेंनी Aditya thackeray खोके दिवस म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांना डिवचले आहे. तर, या आधी शिवसेनेच्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचा फोटो लावून निवडणूक लढा. धनुष्यबाण बाजुला ठेवून मैदानात या, असे म्हणण एकनाथ शिंदेंना ललकारले होते.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहेत की, राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली.

राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT