Aditya Thackeray News : आदित्य ठाकरेंनी आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन दिवसांपूर्वी देखील आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या भेटी मागचे कारण काय याविषयी उलटसुलट चर्चा सुरू होत्या. मात्र, आदित्य ठाकरेंनी या भेटी मागचे कारण स्पष्ट केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या घरांची रेकी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असून त्यांना सुरक्षा देण्यात यावी, ही मागण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे म्हणाले, राजकीय निर्णय होत असतात. मागील काळात नको त्यांना सुरक्षा दिली गेली पण मला त्यात जायचे नाही. मुख्यमंत्री म्हणाले मी सुडाचे राजकारण करणार नाही. राऊतसाहेबांना काही मत मांडत असतील ती विरोधी बाजुची असतील पण ज्यांना गरज त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना केली.
संजय राऊतसाहेबांना धोका वाटतोय त्यावर कुठे तरी उपाय योजना झाली पाहिजे, असे देखील मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. फडणवीसांच्या वारंवार भेट घेतली जात आहे? असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले, तुम्ही भेटी मोजत चालता मात्रे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत पुढील पाच वर्ष भेट होतच राहणार.
घराच्या रेकी विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यात अडीच वर्षांपूर्वी नवीन सरकार जेव्हा आलं, अडीच तीन वर्षांत त्यानंतर सर्व राजकीय विरोधकांची सुरक्षा काढण्यात आली. सरकार बदललं असेल तरी सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था काढणे हा अत्यंत निर्घृण प्रकार आहे. हा राजकीय सूडाचा प्रकार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.