Aditya Thackeray Criticize Nitesh Rane sarkarnama
महाराष्ट्र

ठाकरेंची राणेंवर सणसणीत टीका; पण अवघ्या १० सेकंदात आणि उल्लेखही न करता...

Nitesh Rane-Aditya Thackeray : नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने राणेंचा जामीन फेटाळला आहे. जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याचे संकेत त्यांच्या वकिलांनी दिले आहे. याच सगळ्या घडामोडींबाबत युवासेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रतिक्रिया वाचारली असता त्यांनी "आपण चांगल्या गोष्टीवर बोललं पाहिजे" असं म्हणत अवघ्या १० सेकंदांमध्ये टोला लगावत नितेश राणे यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. (Aditya Thackeray Criticize Nitesh Rane)

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी विलेपार्ले पूर्व, सांताक्रूझ खार दांडा आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पालिकेच्या नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे आढावा घेतला, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नितेश राणे यांचा जामीन अर्ज पुन्हा कोर्टाने फेटाळला आहे, याबद्दल पत्रकारांनी विचारले असताना आदित्य ठाकरे म्हणाले, "मला वाटतं आपण चांगल्या गोष्टीवर बोललं पाहिजे, चांगली कामं केली पाहिजे, महाराष्ट्राला पुढे नेत राहू, देशाला पुढे नेऊ" असे म्हणत नितेश राणे यांचा अनुल्लेख करून टोला लगावला.

काल न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला. पोलिसांच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी बाजू मांडली होती. न्यायालयाने राणेेंचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना अटक करायची की नाही, असा पेच पोलिसांसमोर आहे. कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यासाठी १० दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यामुळे या कालावधीत अटक करायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावेळी ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) हे राणेंच्या बाजूने मैदानात उतरले होते.

सिंधुदुर्ग न्यायालयासमोर काल मोठ्या घडामोडी घडल्या. आमदार नितेश राणे हे सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयासमोर हजर झाले. जामीन फेटाळला गेल्यानंतर राणे न्यायालयातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांनी पोलिसांना गाडी अडवण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मला कायदा शिकवू नका, असे म्हणत त्यांनी पोलिसांशी बाचाबाची केली. त्यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आल्याने तणाव निर्माण झाला. यानंतर राणे बंधू थेट वकिलांसमवेत पुन्हा न्यायालयात गेले. नितेश राणे आता जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत.

नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास सर्वोच्च न्यायालयाने १० दिवसांचा अवधी दिला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर २४ तासांतच नितेश राणे जिल्हा न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांनी शरण येण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित जामिनासाठी अर्ज केला होता. मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते नुकतेच प्रकटले असून, ते मागील काही दिवस कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत होते. (Nitesh Rane bail hearing)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT