Ajit Pawar News : महायुतीलमधील शिंदे आणि भाजपच्या नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. या वादग्रस्त वक्तव्यांचा फटका थेट अजित पवार गटाला भसण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे हे मुस्लिम विरोधी वक्तव्य सातत्याने करत आहेत.
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या तक्रार दिल्लीमधील वरिष्ठांकडे अजित पवार गट करणार आहे. या वादग्रस्त वक्तव्यांचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, अशी भीती अजित पवार गटाला आहे.
शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड तसेच भाजप खासदार अनिल बोंडे यांनी नुकतेच राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले. अशा विधानांमुळे काँग्रेसलाच सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. शिवाय भाजप आमदार मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य करत असल्याने हा समाज देखील महायुतीपासून दूर जाण्याची भीती आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नेत्यांना आवर घातलण्यासाठी थेट अजित पवार गट थेट दिल्ली दरबारी तक्रार करणार असल्याची माहिती आहे.
शिंदे गट तसेच भाजपमधील काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. मंत्री तानाजी सावंत, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधातील वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील नेते आक्रमक झाले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही नेत्यांनी तंबी दिल्याने हे प्रकरण शांत झाले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.