Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. सरकार स्थापन करीत असताना महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुख्यमंत्री पद, खातेवाटप, बंगले आणि आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे.
गेल्या काही दिवसापासून पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील तीनही घटक पक्षात चुरस आहे. त्यामुळे राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा गेल्या काही दिवसापासून करण्यात आलेली नाही. सोमवारी या निवडीला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. त्या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी रात्री सागर बंगल्यावर बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा सुटून घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील मंत्रीमंडळाचे खातेवाटप होऊन १५ दिवसापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यानंतर ही पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली नसल्याने कामे रखडली आहेत. त्यामुळेच सर्वांचे गेल्या काही दिवसापासून याकडे लक्ष लागले आहे. सोमवारी रात्री याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भेट घेणार आहेत. त्या दोघांची बैठक झाल्यानंतर लवकरच राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा काही वेळातच होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मतभेद असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे हे वाटप रखडले होते. मात्र, सोमवारी होत असेलल्या बैठकींनंतर या निवडीला मुहूर्त लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.