Mumbai News : शिवसेनेतील बंड अद्याप राज्यातील जनता विसरलेली नाही. याबंडामुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. तर राज्याची धूरा पक्ष पोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून भाजपशी युती करत घेतली होती. यावेळी राज्यात मोठा राडा किंवा आंदोलन होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण तसे काही झाले नाही. यावरूनच आता दोन्ही शिवसेनेत कलगितूरा रंगला असून भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी यावरून ठाकरे गटाला डिवचे आहे. तर या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण देताना नवा दावा केला आहे. ज्यामुळे आता या वादात तेल पडले असून दोन्ही शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते. तर शिवसेनेचे महत्वाचे नेते यांच्याकडे पाहिले जात होते. तर मुख्यमंत्री म्हणून ते रेसमध्ये होते. पण त्यांना शरद पवार आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हाच मुद्द्या शिवसेनेत कळीचा मुद्द्या ठरला आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय चूल वेगळी मांडली. त्यांनी शिवसेनेतील आमदार खासदार आपल्या सोबत घेत पक्ष आणि चिन्ह ही घेतलं. यामुळे राज्यात शिवसेना मोठं आंदोलन उभारेलं किंवा राडा करेल अशी शक्यता निर्माण झाली होती. पण तसे काहीच झाले नाही. यावरून आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातायत.
याच मुद्द्यावरून आता एका खासगी वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोठा खुलासा करताना दावा केला आहे. शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंच्या आदेशानं आम्ही शांत होतो. अन्यथा भुजबळ, राणेंवेळी जसे राडे झाले ते झाले असते, असं म्हटलं आहे. पण आता त्यांच्या या दाव्यामुळे नवा वाद सुरू झाला असून नारायण राणेंनी तो खोडून काढत टीका केली आहे.
परब यांनी, बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच छगन भुजबळ आणि नारायण राणेंनी बंड केलं होतं. त्यावेळी शिवसैनिक आणि बंडावेळी बंडखोर नेत्यांमध्ये संघर्ष झाला होता. पण तो एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी झाला नाही. त्याला कारणही उद्धव ठाकरे होते. त्यांच्या आदेशामुळेच संतापलेल्या शिवसैनिक शांत होता. मनानं साथ सोडलेले शिवसैनिक आणि काही नेते आता उद्धव ठाकरेंनाच नको होते. त्यामुळेच त्यांनीच शांत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. आमच्यासाठी हा आदेश होता म्हणून आम्ही शांत होतो, असं परबांनी सांगितलं.
परबांच्या या दाव्यावर नारायण राणे यांनी पटलवार करताना, शिवसैनिकाचा आक्रमक स्वभावच राहिला नाही. अनिल परबांचा तर तो कधी स्वभाव होता. त्याने आतापर्यंत कुणाच्या कानशिलात तरी लगावलीये का? असा सवाल करत परबांचा दावा खोडून काढला आहे. तर अनिल परब हा राडे करणारा नाही, तो करूच शकत नाहीत. पण अनिल परब आता खोटं बोलत असल्याचा आरोप देखील नारायण राणेंनी केला आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे खमके आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला नाही, असा दावा शिंदे समर्थकांकडून वेळोवेळी केला जातोय. पण आता परबांच्या या खुलाशानंतर दोन्ही शिवसेनेतील वादाला नव्याने तोंड फुटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.