Bachchu Kadu On Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Bachchu Kadu On Sanjay Raut : संजय राऊत बिना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र; मुख्यमंत्रिपदाबाबत बच्चू कडूंचा मोठा दावा

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यात होऊ घातलेल्या तिसऱ्या आघाडीला फटकारलं होते. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

"संजय राऊत म्हणजे, शिवसेनेचे ब्रेकिंग देणारं बिना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र आहे. ते काही पुऱ्या महाराष्ट्राचं पीआर कार्ड नसून, त्यांचा अभ्यास कमी आहे, त्यांची जहागीरदार नाही, तिसरी आघाडी महाशक्ती म्हणून समोर येणार असून, मुख्यमंत्री महाशक्तीचा होईल", असा दावा बच्चू कडू यांनी केला.

शिवसेनेचे (Shiv Sena) संजय राऊत यांनी राज्यात बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीवर टीका केली. आमदार बच्चू कडू यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चू कडू म्हणाले, "संजय राऊत यांच्याकडे पुऱ्या महाराष्ट्राचे पीआर कार्ड नाही. ते शिवसेनेकडून ब्रेकिंग देणारं आकाशवाणी केंद्र आहे. याशिवाय संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे". ते जहागिरदार नाहीत, तर महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबुतीने उभा राहिलेला दिसेल. ही तिसऱ्या महाशक्तीचा राज्यात मुख्यमंत्री दिसेल, असा मोठा दावा बच्चू कडू यांनी केला. आमची महाशक्ती पुऱ्या देशात आदर्श ठरेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देऊ आणि 288 जागा पूर्ण देऊ असंही त्यांनी सांगितले.

'संजय राऊत यांना मी चांगलं मानत होतो. पण त्यांना माहीत नाही की, दिल्लीत तिसरा पक्ष आला. तिसऱ्या पक्षाने उभच राहू नये, असे वाटत असेल, तर चुकीचं आहे. भाजप किंवा काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी काही काय महाराष्ट्र खरेदी केला का?', असा सवाल बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला.

बच्चू कडू गुलाम राहिला असता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची मित्रता कायम राहील. पण राजकारणामध्ये विचारांना महत्त्व असते. त्यावर आम्ही ठाम आहोत. आमच्या 18 मुद्द्यांपैकी अर्ध्या मुद्यांवर सुद्धा विचार केला. तरी देखील बैठक लावली नाही. आमच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या, तर हा बच्चू कडू गुलाम राहिला असता. पण जाऊ द्या. तिसऱ्या महाशक्तीत येणाऱ्या पक्षांचा विचार केला जाणार आहे. प्रवेश करू इछिणाऱ्यांनी 26 तारखेला छत्रपतीसंभाजीनगर येऊन भेटू शकता, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

संजय राऊतांनी काय केली होती टीका

संजय राऊत यांनी तिसऱ्या आघाडीवर टीका करताना म्हटलं होतं की, "तिसरी आघाडी कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. तिसरी आघाडी हे केंद्रात किंवा राज्यातील सत्तेत असणाऱ्यांना काही अडचणीचे विषय असतात, मग तिसरी आघाडी निर्माण करून, मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल, यासाठी काम करतात. आतापर्यंत तसाच इतिहास आहे. महायुती आणि मविआमध्ये लढत आहे. 'मविआ'ची मते कमी करण्यासाठी, अशा आघाड्या स्थापन करायच्या. पैशांचा वापर, पदांचा वापर करायचा, असं धोरण दिसते आहे", संजय राऊत यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT