No Detention Policy Cancel : सलग आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे धोरण अनेक राज्यांनी स्वीकारले आहे. या 'नो डिटेन्शन पॉलिसी' विरोधात केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणारे विद्यार्थींना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागणार आहे. त्यांना पुढच्या वर्गात ढकलेले जाणार नाही.
'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द करताना नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देखील दिला आहे. नापास झालेल्या पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांना पुन्हा दोन महिन्याने परीक्षा देता येणार आहे. मात्र, या परीक्षेत ते नापास झाले तर त्यांना त्याच वर्गात पुन्हा बसावे लागणार आहे.
देशात तब्बल 16 राज्यात 'नो डिटेन्शन पॉलिसी' धोरण आहे. या धोरणामुळे विद्यार्थी सलग आठवीपर्यंत पास होत असल्याने शिक्षणाची गुणवत्ता राहत नसल्याची टीका केली जात होती. तसेच विद्यार्थी देखील अभ्यास गांभीर्यपूर्वक करत नसल्याचा आक्षेप नोंदवला जात होता.
पहिले ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही. किंवा शालेय प्रगती नाही म्हणून शाळेत काढून टाकायचे नाही म्हणजे नो डिटेन्शन पॉलिसी. या पाॅलिमुळे विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत वरच्या वर्गात ढकलेले जात होते.
नो डिटेन्शन पॉलिसीमुळे विद्यार्थ्यांची आठवीपर्यंत खरी प्रगती कळत नव्हती. मात्र, 9 वी आणि 10 वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यास झेपत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पालकांकडूनच नो डिटेन्शन पॉलिसी रद्द कण्याची मागणी करण्यात येत होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.